मुंबई, प्रतिनिधी । वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती परंतू लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या व याआधीच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेपुढे अनेक स्वप्नं उभी करून त्यांच्यात आशावाद निर्माण केला, प्रत्यक्षात यातील किती स्वप्नं पूर्ण झाली याची स्पष्टता न करता आणखी नवीन स्वप्ने…
Author: saimat team
भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ येथील कला ,विज्ञान आणि पु .ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२०२३ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मीनाक्षी वायकोळे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून भुसावळ शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट मुकेश अग्रवाल त्यांच्या समवेत प्रसिद्ध उद्योजक राजीव शर्मा तसेच अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक माजी विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निलकंठ भंगाळे, डॉ. ए. डी. गोस्वामी नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. संदेश धूम व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी आपल्या अध्यक्षीय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजच्या अर्थसंकल्पात केल्याचे दिसत आहे.कोरोना काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून आला आहे. यामुळे आगामी आर्थिक वर्षांतील (2022-2023) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे तसेच अर्थव्यवस्था मजबूत कशी होईल यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर 8 ते 8.5 टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्येही उमटला आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याचवर्षी डिजीटल करन्सी लॉन्च करण्याची घोषणा केली आहे तसेच 60 हजार नवीन…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत. गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता. अर्थसंकल्प २०२२ मधील महत्वाचे मुद्दे – करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व सपंत्ती जप्त करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व सपंत्ती जप्त करणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय -आयकरात कोणताही बदल नाही आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. सलग सहाव्या वर्षी कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. – जानेवारी २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटीचं जीएसटी…
कजगाव, प्रतिनिधी । एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या झाडांची खुलेआम तोड चालू आहे या वाढत्या वृक्षतोडीमुळे कसे होणार वृक्ष संवर्धन असा प्रश्न उपस्थित होत कजगाव व कजगाव परिसरातून दररोज दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉली मधून अवैधरित्या लाकडाची तस्करी होताना दिसत आहे याकडे महसूल विभाग तसेच वन विभाग लक्ष देण्याची मागणी होत आहे दरवर्षी हजारो झाडे लावायची व तेवढीच तोडायची त्यामुळे झाडांची संख्या वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे तरी संबंधित विभागाने त्यावर लक्ष देऊन कारवाई करावी जेणेकरून वृक्षतोड थांबेल अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कजगाव येथे तीन स्वामिल…
जळगाव, प्रतिनिधी । साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे तसेच पाश्चात्त्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व व युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्व.स्वामी विवेकानंद. जळगावातील श्री रामकृष्ण मिशनचे सर्व भक्त व श्री रामकृष्ण मिशन मठ, पुणे यांच्या वतीने तसेच प्रा.डॉ.रमेश झोपे, श्रीकांत देशपांडे, श्रीधर इनामदार, प्रकाश गलवडे यांच्या अनमोल सहकार्यातून स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ उद्या बुधवार,दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी जळगावात दाखल होत आहे. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन या रथाचे शहरातील काव्यरत्नावली चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास यथोचितपणे स्वागत करून हा सोहळा साजरा करणार आहेत.…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत गावासाठी मंजुर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजना ( ड यादी ) ही चुकीच्या निकषावर करण्यात आलेली असुन , खरे लाभार्थ्यांना या यादीतुन वगळण्यात आले असुन त्यांचा तात्काळ पंतप्रधान आवास योजनेच्या यादी समावेश करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन असंख्य ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आले आहे. या संदर्भात यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आलेल्या लिखित तक्रार निवेदनात नायगाव ग्रामस्थांनी म्हटले आहे की , नायगाव ग्राम पंचामतच्या वतीने दिनांक १ मे२०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा या साठी गावातील लाभार्थ्यांचा सर्वे करून एकुण ४३६घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आजच्या अर्थसंकल्पापूर्वीच सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी झाली आहे. आज(मंगळवार) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर १९०७ रुपयांचा झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी कपात केली होती, मात्र सिलिंडरची किंमत २००० रुपयांपेक्षा जास्त होती. आज (१ फेब्रुवारी) सकाळी दिल्लीत विना सबसिडीवाल्या १४.२ किलोच्या इंडेन गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये गॅस…
मुंबई, वृत्तसंस्था । हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं. दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी…