पारोळा : प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवा, आता डॉ. सतिश पाटलांच्या जोडीला खान्देशात नाथाभाऊ आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढलेली असून विरोधी पक्ष किती ही सांगत असेल तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिल आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच असतील असा दावा करुन भाजपाने राज्यात सत्तेची स्वप्ने पाहु नये असा टोला ना. जयंत पाटील यांनी लगावला. पारोळा येथील विजयानंद मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत कार्यकर्त्यांनी संवाद साधतांना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, गुलाबराव देवकर, आ.अनिल पाटील, माजी आ.मनिष जैन, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी खा.अॅड.वसंतराव…
Author: saimat team
फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या पाडळसे येथील स्वामिनारायण मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. पाडळसे येथील स्वामिनारायण मंदिरात झालेल्या कार्यक्रमात साकेगाव स्वामिनारायण गुलकुलचे प.पु.स.गु.के.के.शास्त्री, कथा वक्ताश्री शास्त्री नयन प्रकाश दासजी जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. कोरोनाने विस्कळीत झालेले जीवन पूर्वपदावर येत असताना शाळा सुरू होण्याच्या अगोदर गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे.
जळगाव : बुलडाणा (Buldhana) येथे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात मुक्ताईनगरमधील काँग्रेस जिल्हा सचिवाला प्राण गमवावे लागले. कॉंग्रेसचे जिल्हा सचिव आसिफ खान (Asif Khan) इस्माइल खान यांचा जागीच मृत्यू झाला. आसिफ खान इस्माइल खान हे औरंगाबादहून घरी परत येत होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास बुलडाणा शिंदखेडजवळ त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. यामध्ये आसिफ यांचा जागीच मृत्यू झाला. खान यांच्यासोबत गाडीत असलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मुक्ताईनगरचे काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांचा समावेश आहे. यामुळे मुक्ताईनगर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाचोरा ः प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील जितेंद्र देविदास पाटील हे भारतीय सैन्यदलात१०१ मराठा बटालियनमधून २१वर्षाच्या कार्य सेवेतून निवृत्त झाले.त्यांची स्वागत सत्कार रॅली काल रोजी सकाळी येथील रेल्वे स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत काढण्यात आली. सैनिक जितेंद्र पाटील यांनी प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर त्यांच्या सत्कार मिरवणुकिला सुरुवात झाली. ओपन जीप फुलांनी सजवून बॅण्ड पथकाच्या माध्यमातून देशभक्तीपर गीत गाऊन भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत सैनिकांचा परिवार, नातेवाईक,मित्र मंडळी व माजी सैनिक देखील सहभागी झाले होते.या वेळी जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था व छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा…
फैजपूर ः प्रतिनिधी महिलांच्या हक्कांसाठी खान्देश नारीशक्ती गृपच्या माध्यमातून अध्यक्षा दिपाली चौधरी यांनी महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करीत असतात. त्याचा फायदा सर्व महिलांनी घेऊन आत्मनिर्भर तथा संघटित होण्याचे आवाहन जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी केले. त्या येथील खान्देश नारीशक्ती व दिपाली गृप्स अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्यातर्फे आयोजित भव्य आत्मनिर्भर महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, रावेर पं.स.सदस्या योगिता वानखेडे, महिला मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संगिता भामरे, ज्येष्ठ निरसेविका शकुंतला भारंबे, माजी नगराध्यक्षा आशालता चौधरी, सपना राणे, विद्या सरोदे,…
अमळनेर ः प्रतिनिधी राजकारणात पडझडही सुरूच असते. सत्तेचा अमर पट्टा आयुष्यभर कोणीही बांधून येत नाही. पण जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान हे कायम असते. जळगाव जिल्हा म्हणजे हा खान्देशचा एक मुख्य पाया आहे. या जिल्ह्याने या देशाला व जगाला अनेक महापुरुष दिले आहे. उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी व बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे अशा थोर व्यक्तींची जडणघडणही जळगाव जिल्ह्यात झाली आहे. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. राजकारण हे विकास कारणासाठी करावे. ही वृत्ती डोळ्यासमोर ठेवून गेले ४० वर्षे एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यात कार्य करत आहेत. ते सत्तेत असताना जळगावमधील अनेक मोठे प्रकल्प उदयास आले. देशात कुठेही जळगाव जिल्ह्याचे…
मुंबई, : राज्यातील ‘नॉट वेटलँड’ म्हणून पडताळणी झालेल्या साईटस् ची पुन्हा पडताळणी करण्यात यावी, वेटलँडस् च्या जतन आणि संवर्धनाचा समावेश माझी वसुंधरा अभियानात करण्यात यावा, तसेच याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची विभागस्तरावर कार्यशाळा घेण्यात यावी, अशा सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणाची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. बैठकीस पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव तथा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा श्रीमती मनिषा म्हैसकर, पर्यावरण संचालक नरेद्र टोके, पर्यावरण विभागाचे उपसचिव जॉय ठाकूर उपस्थित होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते. पर्यावरण आणि…
मुंबईः करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं सर्वसामान्यांसाठी तब्बल १० महिने बंद असलेली मुंबई लोकलसेवा फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा सुरु झाली. मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या या नाराजीनंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकलच्या वेळेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईतील करोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेच बंधन घालण्यात आलं आहे. त्यानुसार, पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ व रात्री ९ वाजल्यानंतर या वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात…
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावर विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. नवी दिल्ली : संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा शब्द समोर आणला होता… हा शब्द होता ‘आंदोलनजीवी’… प्रत्येक आंदोलनात दिसणाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा शब्द वापरला होता. परंतु, पंतप्रधानांच्या याच शब्दावर विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आंदोलनजीवी’ शब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना ‘संयुक्त किसान मोर्चा’ या शेतकरी संघटनेनं व्यक्त केलीय. गेल्या ७५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू…
जळगाव : प्रतिनिधी पर्यावरणाचा र्हास थांबवून वसुंधरा मातेला जैवविविधतेने वैभवशाली करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जळगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी केले. तालुक्यातील असोदा येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व सार्वजनिक विद्यालय असोदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. यावेळी मुलांना पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी सार्वजनिक शपथ देण्यात आली. रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही झाले . या कार्यक्रमास शिक्षण विस्ताराधिकारी प्रतिमा सानप पंचायत समितीच्या कक्षअधिकारी श्रीमती तडवी , केंद्रप्रमुख श्री वाघे , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ खाचणे,…