Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे…

Read More

पहूर, प्रतिनिधी । काल दिनांक 28 सप्टेंबर 2021 वार मंगळवार रोजी पहूर बस स्थानक परिसरातील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील स्वामी समर्थ दुकानातून रोकड सह किराणा सामान चोरीला गेला होता. सदर घटनेचा पहूर पोलिस यांनी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गुप्त बातमी द्वारा माहिती घेत पो.हे. कॉ. ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, कुमावत यांनी संशयित आरोपी रोहित दिपक थोरात वय 22 याला बस स्थानक परिसरात अटक केली असता त्याच्या जवळ रोकड मिळून आली आहे. सदरील आरोपीला जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । नवीन बस स्टॅन्ड परिसरातून आज ५ पाच हजार रुपये किंमत असेलेला मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कृष्णराज हेमराज पाटील (वय-५२) रा.पाचोरा हे जळगावात एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतात. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात ते सात वाजेच्या दरम्यान पाचोरा येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले असता त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळून आला नाही. त्यांनी या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केले आहे. तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारणासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे पोर्टल सुरू करण्यात आले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेत अनेक अधिकाऱ्यांकडे इतर विभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असून प्रभारी राज संपविण्यात यावे अशी तक्रार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने जिल्हा दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीकडे केली आहे. पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांची महाराष्ट्र जन क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे,भारत ससाणे,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,निलेश बोरा,अमोल कोल्हे आदींनी भेट घेऊन जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची तक्रार करून निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ऑडिट होत असते.पण कामावर ऑडिटर प्रत्यक्षात जात नसून कार्यालयात बसून एम.बी.ऑडिट करतात. यामुळे बांधकामात गैरप्रकार होऊन भ्रष्टाचारास चालना मिळाली आहे.बांधकाम विभागाचा पदभार प्रभारी स्वरूपात शाखा अभियंता पहात असून अशाच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ४२ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सुरेश दौलतराम खत्री (वय-४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश खत्री हे सिंधी कॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मिळेल ती मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गेल्याकाही दिवसांपासून काहीही कारण नसतांना मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी भुसावळ रोडवरील खासगी रूग्णालयात २१ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान हॉस्पीटलजवळून काही अंतरावर असलेल्या जळगाव खूर्द रेल्वे फाट्याजवळ आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या…

Read More

धानोरा ता. चोपडा, वार्ताहर । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दि २९ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली.यावेळी वशीला सुरु असल्याचे सांगत गावातील,परीसरातील ग्रामस्थ यांनी सांगितले.तर नाव नोंदणी साठी एकच टेबल असल्याने नोंदणी करण्यास उशीर लागत होता. येथिल स्थानिक कर्मचारी आपल्या मर्जीतील लोकांची नोंदणी अगोदरच ठेवत आहेत.यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.दुसरीकडे दोन वैद्यकिय अधिकारी असुनही येथे लस साठी नियोजन केले जात नसल्याने समस्या अधिक वाढत आहेत.लशींचा पुरवठा व्यवस्थितपणे होत आहे पण येथे लस उपलब्ध असुनही नियोजनशुन्य कामामुळे आलेल्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.काही महीला रोजंदारी थांबवून लस साठी पूर्ण दिवस ताटकळत बसत आहेत.यावेळी खामखेडा बोआ,ज्ञानेश्वर सोनवणे,रवि पाटील यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक येथे २८ रोजी डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झाला आहे, याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील मंदीराजवळ, व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल नगर येथे बुधा खंडू बनसोडे (वय ७०) हे शहरात हमालीचे काम करतात. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता काम आटोपून घराकडे स्वातंत्र्य चौकातून पायी जात होते. त्यावेळी भास्कर मार्केटकडून अमृत योजनेचे डंपर (एमएच १९ झेड २५३४) भरधाव वेगाने आले व बुधा वनसोडे यांना जोरदार धडक दिली. यात ते रस्त्यावर पडले. त्यामुळे डंपरचे पुढचे चाक बनसोडे यांच्या उजव्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर हुडको भागात किरकोळ कारणावरून एका तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती समोर आली आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. गजानन विलास बाविस्कर (वय २७) हा तरुण मारहाणीत जखमी झाला आहे. तर मारहाण करणारी टोळी वाल्मीकनगर भागातील असल्याची माहिती आहे. गजानन याने शिवाजीनगर हुडको परिसरात चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवली हाेती. सोमवारी दुपारी त्याचे एका जणाशी वाद झाले. यानंतर काही वेळातच वाल्मीकनगरातून एका चारचाकीतून तसेच पाच-सहा दुचाकीने काही तरुण हुडको परिसरात आले. त्यांना पाहून गजानन एक स्वच्छतागृहात लपून बसला होता. या तरुणांनी स्वच्छतागृह तोडून त्याला…

Read More