यावल, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र जळगाव,जिल्हा प्रशासन व यावल किसान प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत यावल तालुक्यात दि.13ऑक्टोंबर 2021रोजी सकाळी7ते10 वाजेच्या दरम्यान15गावांतुन यावल तालुका प्रशासन व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या सहकार्याने नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालक योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्यातील15गावांमध्ये एकाच वेळी स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. संपूर्ण तालुक्यातून 3 टन कचरा गोळा करण्यात आला. या कार्यक्रमाला यावल तालुका तहसीलदार महेश पवार साहेब,यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी,यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा ऑफिसर नरेंद्र डागर,अकांटट अजिंक्य गवळी सर व यावल फार्मर…
Author: saimat team
यावल प्रतिनिधी । ४७ वर्षीय शेजमजूराची घरामध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी किनगाव येथे घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतमजूर राजु रामसिंग कोळी (वय-४७) हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आज गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी राजू कोळी यांची पत्नी शेतात कामाला गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने घर बंद करून छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मयताचा मोठा भाऊ अशोक कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच…
मुंबई, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मंदाकिनी खडसे यांना मंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर केला आहे. मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सत्र न्यायालयाने याआधी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांना अटक होण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत होती. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान घेत मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मंदाकिनी खडसेंच्या या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने मंदाकिनी खडसेंच्या अटकेला तुर्तास स्थगिती देत त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पण…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉ. सतिष भास्करराव पाटील यांनी आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या 2021-2026 निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ. अनिल भाईदास पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन सतिषराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालिका तिलोत्मा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळु पाटील, पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती मनोराज पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. शांताराम पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, हरिष पाटील, शिवाजी पवार, युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकूश भागवत, समता परिषद तालुका अध्यक्ष संतोष महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी…
जळगाव, प्रतिनिधी । सखी सुगरण कट्टा आणि तिवारी नगर महीला ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमानेग नवरात्रीच्या निमित्ताने कन्या सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व कन्या रत्नांना खाऊ, मुलींच्या लागणाऱ्या सर्व वस्तू देऊन कन्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सखी सुगरण कट्ट्याच्या अध्यक्षा शैला चौधरी, पुष्पा पाटील, रेखा कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, उज्वला पाटील, माधुरी जावळे, रुंदा पारखे, पल्लवी देसाई, उषा चौधरी, ऋतुजा संत, अबोली पाटील, स्मिता चौधरी, चंद्रभागा चोतमल आदी उपस्थित होत्या.
जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे 65 वा धम्म प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला आहे. इंडियन रेडक्रॉस समोर उद्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पूजन पूज्य भिकखू संघरत्न थेरो जी यांच्या हस्ते व भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर अनुसूचित जाती अध्यक्षा लताताई बाविसकर सामाजिक कार्यकर्ते अशफाक भाई, डॉ गौतम नन्रवरे ,गणेश सोनवणे संतोष बाविस्रकर नागेशदादा सोनवणे अजय देवगन पुरुषोत्तम बाविस्कर पराग ब्राह्मणकार आदी उपस्थित होते
जळगाव, प्रतिनिधी । झोपलेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीस शेतात उचलुन घेऊन जात अत्याचार करणाऱ्या आरोपीस १४ वर्षे सक्तमजुरी व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी न्यायालयाने ठोठावली. अर्जुन अशोक पाटील असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. पाटील हा रिक्षाचालक आहे. २० फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अर्जुनने तालुक्यातील तुरखेडा येथे वीटभट्टीवर राहणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरातून उचलुन नेले. यानंतर शेतात घेऊन जात दमदाटी करुन तीच्यावर अत्याचार केले. ही मुलगी गतीमंद आहे. २१ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलीच्या अाईने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात पोक्सो, अत्याचार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. २१ राेजीच…
मुंबई, प्रतिनिधी । राज्यातील सर्व अकृषी , अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी केली. सामंत म्हणाले की, ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत ते विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. तसेच विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेदेखील लसीकरण प्राधान्याने व्हायला हवे. वर्ग पूर्णपणे की ५० टक्के…
मुंबई, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (जि. पुणे) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे.दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती.
भडगाव, प्रतिनिधी । सततच्या पावसामुळे आलेल्या पुरात भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी भीमा रामा माळी या इसमाचा येथील मुतऱ्या नाल्यात वाहुन गेल्याने दि.२८ सप्टेंबर रोजी दुर्दवी मृत्यू झाला होता दरम्यान त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांचा धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. मयताची पत्नी भागाबाई भीमा माळी यांना त्यांचे गुढे येथील घरी जात आमदारांनी या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अवघ्या पंधरा दिवसात मयताच्या वारसांना शासकीय मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे,माजी जि प सदस्य विकास पंडीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील (भुरा आप्पा ),शिवसेना तालूका प्रमुख ,डॉ विलास…