जळगाव, प्रतिनिधी । छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी खिरोदा प्र. या. तालुका रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन रमेश चौधरी (खिरोदा प्र.या., ता. रावेर) यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा मंगलाताई सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर, प्रतिभा भालेराव, जिल्हा सदस्य कृष्णा जमदाडे , नेमाडे , सोनवणे , मोतीराडे व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते . नितीन चौधरी हे केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत, तसेच त्यांनी काँगेसच्या युवक जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देखील यशस्वीपणे पार पाडलेली आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री…
Author: saimat team
जळगाव,प्रतिनिधी। शहरातील एका भागामध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील आंबेडकरनगरात राहणाऱ्या लक्ष्मी सचिन सैंदाणे (वय २९) या विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद…
मुंबई, वृत्तसंस्था । गेले दीड वर्ष बंद असलेली राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहेत. मर्यादित उपस्थिती, लसवंतांनाच प्रवेश हे नियम लागू राहतील. मात्र, सध्या ऑनलाइन सत्र परीक्षा सुरू असल्याने अनेक महाविद्यालयांनी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या संकुलातील गजबज दिवाळीनंतरच वाढण्याची शक्यता आहे. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर ग्रामीण भागांतील काही महाविद्यालये अल्प कालावधीसाठी सुरू झाली होती. परंतु, दुसऱ्या लाटेनंतर सर्वच महाविद्यालये पुन्हा बंद झाली होती. सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी बुधवारपासून वर्ग सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. के वळ विज्ञान, अभियांत्रिकी आदी शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बोलावले जाणार आहे. करोना…
मुंबई, वृत्तसंस्था । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ करण्यात आलीय. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केलीय. या दरवाढीबरोबरच ऑक्टोबर महिन्यातील एकूण इंधन दरवाढ ही साडेचार रुपये प्रती लिटरपर्यंत पोहचली आहे. आजची दरवाढ ही या महिन्यातील १५ वी दरवाढ ठरलीय. इंडियन ऑइल कॉर्परेशन लिमिटेडने आज जारी केलेल्या नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल १०६.१९ रुपये लिटर तर डिझेल ९४.९२ रुपये लिटरपर्यंत पोहचलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ११२.११ रुपये तर डिझेलचे दर १०२.८९ रुपयांवर पोहचलेत. ऑक्टोबरमध्ये १५ वेळा वाढले दर… ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत १५ वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत.…
जामनेर, प्रतिनिधी । पिंपळगाव बु येथील हनुमान मंदिराजवळ बऱ्याच दिवसापासून असलेले घाणीचे साम्राज्य काही दिवसापासून पसरलेले होते, तरी देखील मंदिराजवळील गाजरी गवताचे व काटीचे झुडपे काढून संपूर्ण परीसर स्वच्छ करण्यात आला. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी गावात विजेच्या धक्क्याने माकडाचा म्रुत्य झाला होता, त्या माकडाचा अंतिम संस्कार करण्यात आला. गावातील रविंद्र महाजन यांच्यासह तरुणांनी हिंदू धर्माच्या पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले.
मुंबई, वृत्तसंस्था । दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. करमणूक उद्यानेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपाहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळ…
जम्मू, वृत्तसंस्था । भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे. राजौरी सेक्टमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरु असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता.…
जळगाव, प्रतिनिधी । इस्लाम धर्म व त्यावर अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांनी प्रत्यक्षात आचरण करून दाखवलेले चरित्र यांचा ताळमेळ म्हणजेच इस्लाम धर्म होय. इस्लाम धर्मात आतंकवाद, धर्मपरिवर्तन व लव जिहादला थारा नसल्याचे मत इस्लाम धर्माचे मराठीचे गाढे अभ्यासक डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर व डॉक्टर इक्राम काटे वाला यांनी मांडले. तर इस्लाम धर्माच्या शिकवणी नुसार आपले जीवन व्यतीत करून दाखविले त्या बाबत डॉ इक्राम खान हे बोलत होते. ईद-ए-मिलादुन्नबी अर्थातच हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी आयोजित व्याख्यानमालेत जळगाव जिल्हा पत्रकार संघात हे वक्ते बोलत होते. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थानी जळगाव शहर काजी व मस्जिद उमर चे इमाम मुफ्ती अतिकुर…
जळगाव प्रतिनिधी | सामाजिक कार्यकर्ते जमील देशपांडे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे जमील देशपांडे हे मनसेत पहिल्यापासून सक्रीय आहेत. त्यांनी आधी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी देखील समर्थपणे पार पाडलेली आहे. तर जळगाव शहरासह जिल्ह्यात मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाची एक अतिशय परिणामकारक चळवळ सुरू केलेली आहे. दरम्यान, आज जमील देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी ठाकरे यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या अनुषंगाने आता देशपांडे यांच्यावर जळगाव शहर, जामनेर, मुक्ताईनगर आणि भुसावळ या मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व…
जळगाव, प्रतिनिधी । २० वर्षीय विवाहितेचा दोन लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सुप्रीम कॉलनी येथील शमिना आसिफ खान (वय-२०) ह.मु. सबजेल पाठीमागे याचा विवाह शहरातील आसिफ खान रेहेमतुल्ला खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. पती आशिफ खान व त्यांच्या कुटुंबियांनी सुरूवातीला विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान आई – वडीलांची परिस्थीत गरीबीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करून शकत नसल्याचे विवाहितेने सांगितले. याचा राग येवून पती आशिफ खान याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे घरातील सासरे, जेठाणी, दिर यांनी देखील शारिरीक…