जळगांव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील उर्दू माध्यम प्रतिनिधी व उर्दू सोशल मीडिया च्या माध्यमाने सेवा देणारे पत्रकारांचा जळगांव जिल्हा मानियार बारादरी तर्फे शाल व समूर्ती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या पस्तीस वर्षात पहिल्यांदाच एखाद्या संघटनेने जळगाव जिल्ह्यातील विविध उर्दू वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना त्यांच्या सेवांचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान केल्या बद्दल वरिष्ठ पत्रकार अली अंजुम रिझवी यांनी बिरादारीचे कौतुक केले. ईद ए मिलाद च्या निमित्ताने पतंत्रकार भवन येथे “इस्लामच्या पैगंबरांचे पवित्र जीवन” या विषयावरील परिसंवाद ठेवले होते. या परिसंवादा चे वक्ते डॉ.रफिक पारनेरकर, डॉ. इकरम खान आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष काझी शहर मुफ्ती अतीक-उर-रहमान होते त्यांच्या हस्ते…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येत आहे. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ७४४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, याच एका दिवसात ४० रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ६४ लाख ३२ हजार १३८ वर पोहोचला आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९७.४६ टक्के इतका झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ९९ हजार ८५० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्या जरी नियंत्रणात येत असली तरीही निश्चितच…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड उर्फ सोसायटी जळगाव चे होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूक 2021 बाबत लोकमान्य प्रगती गटाची मनोमिलन सहविचार सभा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटना कार्यालय जळगाव येथे लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर शिवराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. वेध प्रगती गटाचे अध्यक्ष रवींद्र साळुंखे, प्रभाकर सोनवणे, अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकमान्य गटाच्या नेतेपदी तत्कालीन गस सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. येत्या काळात होऊ घातलेल्या तसं सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत सभासदांना समोर संस्थेच्या सभासद हितासाठी ध्येय धोरणे आखण्यात आली. कमी व्याजदरात कर्ज , मयत सभासद स शंभर टक्के कर्जमाफी ,…
यावल, प्रतिनिधी । शिक्षण हीच व्यक्तिगत, सामाजिक आणि वैश्विक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शैक्षणिक संस्था समाज उद्धाराचे केंद्र बनली पाहिजे. सर्वांच्या सहभागातून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभारणीसाठी कटिबद्ध राहू असे मत शिरिष चौधरी अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपुर तथा आमदार रावेर – यावल विधानसभा मतदार संघ यांनी व्यक्त केले. ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आयोजित संस्था पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. तापी परिसर विद्या मंडळ, फैजपुर ची कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मा संस्था पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरिष…
फैजपूर, प्रतिनिधी । स्व. दादासाहेब जे टी महाजन व स्व. डिगंबर शेठ नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर दि. २२ ऑक्टोबर २०२१ शुक्रवार पासून संपूर्ण यावल- रावेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. २२ ऑक्टोबर ला न्हावी येथून झाला. जळगाव सिव्हिल हॉस्पिटल व न्हावी ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी झाला. टी एम इ सोसायटीचे अध्यक्ष शरद महाजन यांनी फीत कापून उदघाटन केले. पहिल्याच दिवशी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच भारत विद्यालय न्हावी येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पी. एच. महाजन…
पहूर ता जामनेर, प्रतिनिधी । पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती.तर एक जण फरार झाला होता. याप्रकरणी अटकेत असलेले दत्तू कडू उगले, भास्कर काशिनाथ वाघ, ज्ञानेश्वर कडू उगले यांच्यासह महादू कडू उगले, किर्तीराज केशव उगले, सागर उगले या सहा आरोपींना आज जामनेर न्यायालयात हजर केले…
जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आजादी का अमृत वर्ष साजरे करायचे निश्चित केले आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र व जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आज जळगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील 5 व्यापारी संकुलातील सिंगल युस प्लास्टिकचा 1.5 टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, मनपा उपआयुक्त शाम गोसावी, कवियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकज ननावरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रासेयो जिल्हा नोडल अधिकारी डॉ. दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा…
जळगाव, प्रतिनिधी । पॅप स्मीयर चाचणी: आमच्या प्रेसिडेंट नीता परमार नी संकल्प रुग्णालय च्या डॉ. हेमागिनी कोल्हे gyanololigist यानी मुख्य अतिथी डीसी अश्विनी गुजराती संग क्लबच्या 15 सदस्यांची चाचणी घेण्याच प्रभंद् केला. नीता परमर, बबिता मानधन, कार्तिकी शाह, सीमा ढाकते, प्रीती दोशी, दीपा टिबरवाल, आशा गड्या, रुची मणियार, कविता कराचीवाला इत्यादींचा उपस्थित होते. आमच्या पीडीसी संगीता जी यांनी उडान फाउंडेशनच्या मतीमंद मुलांना राइटिंग बोर्ड प्लस टेबल उपलब्ध करून दिले. क्लब च्या प्रेसिडेंट नीता परमार तर्फे गरजू मुली ला सिलाई मशीन उपलब्ध करून दिले. गरजू मुलीं च्या भविष्य निर्माण साठी शिलाई शिकवण्याच्या 1 महिन्याच्या प्रशिक्षण सत्रासाठी श्रीमती शोभना मखवाना यांचा सत्कार…
अमळनेर प्रतिनिधी । हॉटेलमध्ये एकाने चाकूचा धाक शिवीगाळ केल्याचे व बियरची बाटली हिसकाविल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर येथील दादावाडी परिसरात राहणाऱ्या नंदलाल रामचंद्र पाजेवाणी (वय-६५) यांचे अमळनेर शहरातील शहीद हेमो कलाली रोडवर हॉटेल आराम परमिट रूम आहे. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दादू एकनाथ निकुंभ रा. पारधीवाडा अमळनेर याने नंदलाल पाजेवाणी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत २०० रूपये किंमतीची बियर जबरीघेतली. आणि मी परत येतो दुकान बंद करून नको अशी धमकी देवून गेला. याप्रकरणी नंदलाल पाजेवाणी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दादू निकुंभ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
यावल, प्रतिनिधी । जिल्हा परिषद आणि यावल नगरपरिषद निवडणूक संपूर्ण जागा आम्ही स्वबळावर स्वतंत्रपणे लढणार असल्याची तसेच यावल नगरपालिकेत चांगले सदस्य निवडून आले तरी प्रत्यक्ष कारभार पाहणारे मात्र वेगळेच असतात त्यामुळे यावल शहराचा गुणात्मक विकास झाला नाही यावल नगरपालिकेत अनेक विकास कामांमध्ये गैरप्रकार भ्रष्टाचार तसेच बोगस कामे झाली असल्यामुळे त्या कामांचा पाठपुरावा करून वेळेप्रसंगी संबंधितांवर फौजदारी किंवा दिवाणी गुन्हे सुद्धा दाखल केले जातील.आजही यावल शहर जसे आहे तसेच आहे विधानसभा निवडणुकीत आणि इतर विविध कार्यक्रमातून यावल शहरातून मला विशेष सहकार्य मिळाले आहे याचे उपकार विकास कामाच्या माध्यमातून फेडणार असल्याची माहिती जनशक्ती या लोकप्रिय प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच…