भुसावळ प्रतिनिधी – स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले म्हणजे स्त्रीमुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील, असे प्रतिपादन हभप गंगाधर महाराज कुरूंदकर (हिंगोली) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात ‘शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन’ या विषयावर हभप कुरूंदकर बोलत होते. हभप गंगाधर महाराज यांचा परिचय डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. हभप कुरूंदकर यांनी ‘शिवराय मनामनात’ हे गीत म्हटले. त्यानंतर ते म्हणाले की, तुकोबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनमुक्ती व जनआंदोलन केले.…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी (इकरा नगर)- येथील इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 17 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन कॉलेज चे चेअरमन मा. अब्दुल रऊफ शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. इरफान शेख, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या फूड फेस्टिवल ला इकरा नगर येथील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, इकरा डी.एड. कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भेट दिली व विविध…
जळगाव प्रतिनिधी : प्रत्येक घरात नळाचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. याच योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १७१ गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून यासाठी ३३६ कोटी ५३ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या ऐतिहासीक क्षणाची साक्ष म्हणून या सर्व गावांच्या सरपंचांना बोलावून त्यांना प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. योजना मंजूर झालेल्या गावांच्या सरपंचांनी अचून नियोजन करून आपल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे आवाहन करतांना याबाबत पालकमंत्र्यांनी त्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्यात. दरम्यान, एकाच वेळेस एका जिल्ह्यातील १७१ गावांना पाणी…
कोळगाव ता-भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच पुजन करुन अभिवादन करण्यात आले,तद्नंतर शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
बोदवड प्रतिनिधी :- नगरपंचायत नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे आनंदा पाटील तर उपनगराध्यक्ष पदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आज दिनांक 18 रोजी बोदवड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक पार पडली नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आनंदा पाटील व राष्ट्रवादी कडून योगिता खेवलकर हे निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते व उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कडून रेखा गायकवाड आणि राष्ट्रवादीकडून मुजमिल शाह यांचे उमेदवारी अर्ज आलेले होते सभेमध्ये निवडी साठी हात उंच करून मतदान घेण्यात आले त्यात शिवसेनेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना शिवसेनेचे नऊ नगरसेवक आणि भाजप च्या एकमेव उमेदवाराने मतदान केले त्यानुसार दहा विरुद्ध सात शिवसेनेने नगरपंचायत वर आपली सत्ता प्रस्थापित…
चाळीसगाव/प्रतिनिधी गुणवंत दादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून सेवा सहयोग फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. बाणगाव वाघडू ,वाकडी या गावांना स्कूल किटचे वाटप. चाळीसगाव तालुक्यात गरजू आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय स्कूल किटचे वाटप गुणवंत दादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून वाटप करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी तालुक्यातील पूरग्रस्त बाधित बानगाव वाघडू वाकडी या गावांना शालेय स्कूल किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी सेवा सहयोग फाउंडेशन चे गुणवंत दादा सोनवणे सहकुटुंब उपस्थित होते. त्याचबरोबर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेब, विस्तार अधिकारी भाऊसाहेब , केंद्र प्रमुख ,लोकनायक तात्यासाहेब महेंद्र सिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा…
विद्यार्थी हा केंद्र बिंदू – प्रो .कुलगुरू डॉ .बी .व्ही .पवार यांचे प्रतीपादन जळगाव प्रतिनिधी : इकरा शिक्षण संस्था व्दारा संचलित एच. जे. थीम महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 फेब्रुवारी, 2022 गुरुवार रोजी एच. जे. थीम महाविद्यालय, मेहरूण येथे एक दिवसीय ‘ प्राचार्य/ संचालक व विद्यार्थी विकास अधिकारी कार्यशाळा ’ आयोजित करण्यात आली. कार्यक्रमा ची सुरवात कुराण पठणाने डॉ.अख्तर शाह यांनी केली. महाविद्यालयातील विद्यार्थीनिनी रीफत फातेमा याने इकरा संस्थे चे तराना- ए- इकरा गीत गाईले. प्रस्तावना महाविद्यालया चे प्रभारी प्राचार्य आय.एम.पिंजारी यांनी केली. कार्यक्रमाचे उद् घाटन प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे…
मोहाडी रोड लांडोरखोरी उद्यान जवळच संचलित ज्योतिक्रिष्णा इंग्लिश स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विध्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे शौर्य पोवाडा मधून दाखविण्यात आली. मधुबन गुरुकुल शाळेचे नर्सरी विभागातील बालगोपाल विविध वेशभूषा करून आले. जिजामाता च्या वेषात.. जिज्ञासा गवळी, वेदिका सपकाळे, हर्षाली चौधरी.. मावळा.. प्रशांत चौधरी, तानाजी मालुसरे तनिष्का चौधरी… याच बरोबर 5 वी ते 10 वी चे विध्यार्थी लावण्या सूर्यवंशी, श्रेयश इंगळे, क्रिश पाटील, गौरव बारसे, ऐश्वर्या वाणी यांनी स्पीच कंपेटिशन मद्ये सहभाग नोंदवीला… शाळेच्या शिक्षिका सौं. नीता सोनवणे यांनी महाराजांचे चरित्र वाचले प्रिन्सिपॉल सौं. ज्योती मॅम यांनी आपल्या भाषणात सांगितलं असे शूरवीर योद्धा यांचे शिवचरित्र सर्व…
जळगाव प्रतिनिधी : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर, जळगाव. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मुकेश सावकारे , आधारस्तंभ फाउंडेशन अध्यक्ष जळगाव तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पोवाडा गाऊन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी आयुष पाठक या विद्यार्थ्यांने शिवरायांची वेशभूषा केली.श्री मुकेश सावकारे सरांनी छत्रपती शिवाजी महाराज व आजचा विद्यार्थी या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आजचा विद्यार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कौशल्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आजच्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षेतील अडचणी…
जळगाव, (प्रतिनिधी ) : बिलवाडी परिसरातील कुरकुट नाल्यावर बांधारायुक्त पुलांसाठी तब्बल २० कोटी रूपयांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. पुलांच्या कामांमुळे ग्रामीण भागातील दळण – वळण सोईचे होणार असून शेती विकासालाही गती येईल. बिलखेडा ते बिलवाडीच्या दरम्यान गलाठी नदीवरील १ कोटी ३४ लाख रूपयांच्या निधीतून तयार होणार्या पुलाच्या भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. हा पूल २० मीटर लांबीचा असून याच्या माध्यमातून परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकर्यांना सुविधा मिळणार आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रदीर्घ काळापासून मागणी करण्यात आलेल्या या पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आनंद…