जळगाव, प्रतिनिधी । जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थांतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले. पहाटे ४ वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता श्रीराम मंदिर संस्थांनचे विश्वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली व प्रभू श्रीरामांच्या जयघोषणात श्रीराम रथोत्सवाला सुरूवात झाली. रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी सुरू आहे. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील उपशिक्षक श्री.प्रशांत साखरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS परीक्षा संपन्न झाली. सदर परीक्षेला निरीक्षक म्हणून प्रीती सोज्वळ( केंद्रीय विद्यालय एन. एम. यू .जळगाव) तर सहाय्यक परीक्षक म्हणून वसीम शेख (समावेशित विशेष तज्ञ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव )वृषाली चौधरी ( विशेष शिक्षिका, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव) हे उपस्थित होते. प्रथमतः विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सदर परीक्षेला प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री विजय पवार साहेब यांनी भेट दिली. सूत्रसंचालन श्री किशोर सोनवणे व आभार श्री सागर पाटील यांनी मानले. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या…
जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण सुरू असतांना आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुका येथे एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत १५०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीचे पथकाला गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ट्रकमधून वाहतूक करतांना १५०० किलो गांजाची पोती जप्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित आरोपी हे आंध्र प्रदेशातील आहे. Maharashtra: Mumbai NCB team seized 1500 kgs of Ganja near Erandol in Jalgaon district; two people apprehended for questioning. The Ganja…
जळगाव, प्रतिनिधी । येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे. कोविडच्ज्ञा दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील सेवाभावी आणि अत्यंत यशस्वी उपचारानंतर गेल्या 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरू झाले आहे. रुग्णालयात सर्व अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर्जेदार आरोग्य सेवा शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड पंचतारांकित आरोग्यसेवा व विविध आजारांवरील…
जळगाव प्रतिनिधी | गर्भवती महिलेस दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची घटना होती. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. इतक्यात सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत…
पंढरपूर, वृत्तसंस्था । कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांना मिळाला. यावेळी अजित पवार म्हणाले की, ’18-20 महिने मंदिर बंद होती. वारीत खंड पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही मला म्हणायचे हे पुर्वरत व्हायला पाहिजे. मात्र कोरोना कमी होत नव्हता. मात्र, यंदा प्रशासनाला चांगली साथ दिली. सगळ्यांनी एकत्रित ठरवून यात्रा केली. आता मंदिरंही सुरु झाली आहेत. महापूजेमध्येही मी सहभागी झालो. पण, महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय कोरोनानं…
जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे ग्रुप ग्रामपंचायत जव्हार मध्ये आज सकाळी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट एस आर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माझे जिल्हा सदस्य राजधर पांढरे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील माजी उपसरपंच रवींद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गणेश पांढरे राजधर पांढरे एडवोकेट एस आर पाटील रामेश्वर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले तर आभार माजी उपसरपंच रवींद्र मोरे यांनी मानले यावेळी सांडू तडवी शेख चांदतडवी नसृद्दिन तडवी जिल्हा सचिव…
अमरावती, प्रतिनिधी । शहरात झालेल्या हिंसक घटनेनंतर रविवारी अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. या प्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून रविवारी सायंकाळपर्यंत ५० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्रिपुरातील कथित हिंसाचार घटनेच्या अफवेने राज्यात निघालेले मोर्चे आणि त्यानंतर अमरावतीसह इतर शहरांत उफाळलेला हिंसाचार या घटनांची चौकशी केली जाईल व दोषींना कठोर शासन केले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी प्रसार माध्यमांना दिली. अमरावतीमध्ये ४ दिवस संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सुविधाही बंद केली आहे. रविवारी भाजपने अमरावतीच्या ग्रामीण भागात बंद पुकारला होता. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. पण एकूण राज्यातील स्थिती नियंत्रणात…
यावल, प्रतिनिधी । काल दि.14 रविवार रोजी सकाळी आठ तीस वाजता तालुक्यातील एका तलाठ्याच्या समक्ष भुसावल रोडवर पेट्रोल पंपाजवळ वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळून गेले किंवा त्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई होऊ नये म्हणून सोडून देण्यात आले का? तसेच संध्याकाळी आठ तीस वाजता भुसावल रोडवरच एका हॉटेलात 2ते3 तलाठी आणि पश्चिम भागातील एक वाळू तस्करांची पार्टी झाल्याने तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की वाळूने भरलेला ट्रॅक्टर सुसाट वेगाने जात असल्याची माहिती तापी नदी किनारपट्टी जवळील गावातील एका तलाठ्याला दिसले असता त्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग त्या तलाठ्याने केला. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला थांबवले सुद्धा…