पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । पहुर पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवाल्यामार्फत म्हशीची गाडी सोडण्यासाठी त्याच्या अकाऊंट वर आलेले २ लाख रुपये तसेच सबंधित पोलिस अधिकारी यांच्या शी झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे जिल्हा पोलिस दलात तसेच इतरत्रही एकच खळबळ उडाली. या दोन लाखाच्या स्विकारलेल्या लाचेमुळे पहुर पोलिस चांगलेच अडचणीत आले. या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश डीवायएसपी कैलास गावडे यांना दिले. आज दि.१५रोजी दुपारी चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी कैलास गावडे हे त्यांच्या पथकासह पहुर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी चहावाला गोपाल आस्कर ,पो.काँ.अमोल कुमावत, शेख अमिन,शेख अझरुद्दीन,आत्माराम तेले(धनगर)यांची चौकशी…
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शहा तसेच यावल तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दि. 15 डिसेंबर रोजी यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वर्ष २००६ मध्ये केरळ येथे स्थापन झालेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेचे जाळे आता देशभरात पसरले आहे.ही संघटना अत्यंत जहाल असून अनेक देशविघातक आणि समाजविघातक कार्यात गुंतलेली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.ही संघटना देशातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.या दृष्टीने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संदर्भात अत्यंत गंभीर अशी सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत…
भुसावळ, प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. त्यांच्याकडे जशी खिलाडूवृत्ती आहे तशी प्रत्येकाकडे असायला हवी. जय पराजयाची ते चिंता करीत नाहीत. लढणे हा त्यांचा स्थायीभाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळात केले. भुसावळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी चषक जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा (पुरुष गट) आयोजित केलेल्या आहेत. जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात उद्घाटन सत्रात माजी महसूलमंत्री खडसे हे बोलत होते. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ध्वजारोहण तर उद्योजक राजेश राका यांनी क्रीडांगण पुजन केले.…
मुंबई, वृत्तसंस्था । सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दुर्दैवी आहे मात्र ओबीसी अरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये अशी आमची भूमिका आहे यासाठी राज्य सरकार निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. मा. सर्वोच न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील मोठा फटका बसला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की आम्ही वारंवार केंद्राकडे ओबीसी आरक्षण टिकावे यासाठी लागणार डाटा मागत होतो. सुप्रीम कोर्टात देखील आम्ही हीच मागणी केली होती. मात्र भारत सरकारने…
जळगाव, प्रतिनिधी । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज सकाळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके (धुळे) यावेळी उपस्थित होते. महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शासन आणि माध्यमांमधील संवाद वृद्धिंगत होईल. जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माध्यमांमधील नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाची माहिती करून घेत शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहण्याची सूचना केली. जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत आणि श्री.…
जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, “छात्र नेता” संमेलन कार्यक्रमात कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. परिसराची कार्यकारणी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप महारष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे उपस्थित होते. कार्यकारणीची निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप जळगाव महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील यांनी काम पाहिले. यावेळी मंचावर महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील, महानगर मंत्री रितेश महाजन, कवयित्री बहिणाबाई नगर नगर मंत्री आकाश पाटील उपस्थित होते. अभाविप प्रदेश सहमंत्री यांनी अभाविप मांडणी करत. अभाविपच्या व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा ज्वलंत इतिहास कार्यकर्त्यांसमोर मांडला. अभाविपच्या कामात सामूहिक तिचे महत्त्व पटवून दिले.तसेच परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी…
मुंबई, वृत्तसंस्था । तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे. तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला होता. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बधुवारी त्यांचं निधन झालं. तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका मेडिकल व्यावसायिकाची दीड लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडली याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रिंगरोडवरील राहणाऱ्या मेडीकल व्यवसायीकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्न नरेंद्र जैन (वय-३५) रा. चंद्रप्रभा कॉलनी रिंगरोड हे मेडीकल साहित्य खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. ९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी फार्मासीटीकल इण्डी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्याला सिरीन अर्थात…
मुंबई, वृत्तसंस्था । देशामध्ये डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया प्रकरण घडलं , सार्वजनिक ठिकाणी अत्यंत क्रुर आणि हिंसात्मक घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून १६ डिसेंबर पासून राज्यभरात “आदिशक्ती अभियान” उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वतीने देण्यात आली. या अभियानाची सुरुवात रंगशारदा सभागृह , बांद्रा वेस्ट , मुंबई येथे संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे. स्त्री शिकून कितीही स्वावलंबी झाली, प्रगतीची असंख्य शिखरं तिने पार करुन वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला तरी ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली किंवा निर्भय झाली असं आजही म्हणता येणार नाही.…
मुंबई, वृत्तसंस्था । जगात आधीच कोरोना विषाणूने थैमान घातले असताना राज्यावर कोरोनाचे नवे संकट ओमायक्रॉनचे संकट वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र जनतेला नेहमी वेठीस धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र विसर पडल्याचे वारंवार दिसून येत आहे. राज्यातील अनेक नेते बैठका आणि सभेच्या ठिकाणी विनामास्क फिरताना दिसून येतात. याचदरम्यान, मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क भिरणाऱ्या भाजपच्या आमदारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंत्रालयाच्या आवारात विनामास्क फिरणाऱ्या भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आ. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. मंगेश चव्हाण यांनीही…