खामखेडा येथील धनगर समाज युवक मंचतर्फे व्याख्यानात प्रतिपादन
साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी राज्य कारभार करताना संयमी वृत्ती आणि बुद्धी चातुर्याने प्रशासन, संघटन आणि व्यवस्थापनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत कौशल्यपूर्ण नियोजन केले. त्यामुळे शस्त्र अन् शास्त्राविषयी समर्पणाचा भाव म्हणजे अहिल्याबाई होळकर असल्याचे प्रतिपादन यावल येथील सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी केले. याप्रसंगी त्यांनी आपल्या व्याख्यानात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास मांडला. तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिरपूर तालुक्यातील खामखेडा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या साजरी करण्यात आली. खामखेडा येथील धनगर समाज युवक मंचतर्फे त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, सरपंच लहू धनगर उपस्थित होते.
अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनात आलेली संकट आणि त्यावर त्यांनी केलेली मातवर भाष्य केले. धर्म आणि कर्म यात समन्वय साधत शस्त्र आणि शास्त्राची ओळख जनसामान्यांना करून देणाऱ्या अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाची महती विशद केली. अहिल्याबाईच्या समर्पणवृत्तीला मांडताना उत्तम अशा राज्यकर्त्या असल्याचा उल्लेख डॉ. नरेंद्र महाले यांनी केला.
मंचतर्फे रक्तदान शिबिर, गुणवंतांचा सत्कार
कार्यक्रमात रक्तदान शिबिर, गुणवंतांचा सत्कारासारखे उपक्रम राबविण्यात आले. यशस्वीतेसाठी खामखेडा धनगर युवक समाज मंचच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रुपेश धनगर तर आभार ललित धनगर यांनी मानले.