भारतात लँड होताच पीएम मोदींनी गाठले ‌‘इस्रो‌’, केल्या ३ मोठ्या घोषणा

0
2

साईमत, बंगळुरू : प्रतिनिधी

चांद्रयान-३ टीमच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बंगळुरूमधील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी शास्त्रज्ञांची भेट घेतली. इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी पीएम मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधानांनी सोमनाथ यांची गळाभेट घेतली आणि त्यांची पाठ कौतुकाने थोपटली. पंतप्रधान जेव्हा कमांड सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा शास्त्रज्ञांनी ५ मिनिटे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. इस्रो प्रमुखांनी प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरल्याचे चित्र पंतप्रधानांना सादर केले. चांद्रयान-३ चे मॉडेल देऊन सन्मान केला. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर त्यांनी ग्रीसचा एकदिवसीय दौरा केला. हा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले. त्यांनी थेट इस्रोचे बंगळुरूतील मुख्यालय गाठले.

शपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इस्रोच्या चांद्रयान-३ ने यशस्वी लँिंडग केले. त्याव्ोळी मी परदेशात होतो. पण मन मात्र भारतात होतं. संपूर्ण लक्ष चांद्रयान ३ मोहिमेकडे लागून राहिले होते. चांद्रयान ३ ने यशस्वी लँिंडग केले आणि सगळ्या भारतीयांना आपण एखादी परीक्षा उत्तीर्ण झाल्यासारखे वाटले. या मोहिमेसाठी शास्त्रज्ञांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीला आणि धैर्याला मी सलाम करतो, अशा शब्दांत मोदींनी इस्त्रोचं कौतुक केलं. स्पेस मिशनमध्ये टचडाऊन पॉईंटला नाव देण्याची परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर चांद्रयान ३ उतरलं, त्या जागेचं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी चांद्रयान ३ चं मून लँडर उतरले, ती जागा आता शिवशक्ती पॉईंट नावाने ओळखली जाईल, अशी घोषणा मोदींनी केली. यानंतर इस्रोच्या कार्यालयात टाळ्यांचा कडकडाट झाला.

२०१९ मध्ये भारताचे चांद्रयान २ मिशन अपयशी ठरले. चांद्रयान-२ अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरले. त्याला चंद्रावर सॉफ्ट लँिंडग करण्यात अपयश आले. चांद्रयान-२ ने क्रॅश लँिंडग केले. त्या ठिकाणालादेखील नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितले. चांद्रयान २ नं जिथे क्रॅश लँिंडग केलं, ते स्थान यापुढे तिरंगा पॉईंट म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा मोदींनी केली. भारताचं चांद्रयान ३ नं २३ ऑगस्टला चंद्रावर लँिंडग केले. हा दिवस यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाईल, अशीही घोषणा
पंतप्रधानांनी केली.

नारी शक्तीचा केला सन्मान
चांद्रयान ३ मोहिमेत सहभागी झालेल्या महिला शास्त्रज्ञांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. याव्ोळी नारीशक्तीचा उल्लेख करत ते म्हणाले की, निर्माणापासून प्रलयापर्यंत सृष्टीचा आधार नारी शक्तीच आहे. आपण सर्वांनी पाहिले की चांद्रयान ३ मध्ये आपल्या देशातील महिला वैज्ञानिकांनी, देशाच्या नारी शक्तीने फार मोठी भूमिका पार पाडली आहे, असेही मोदी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here