उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवत व्यक्त केल्या सहवेदना
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाचा गुरुवारी, १२ जून रोजी अपघात होऊन दोनशेंच्यावर प्रवाशांसह अन्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशा सर्व निष्पाप नागरिकांना शनिवारी, १४ जून रोजी सायंकाळी शहरातील गुरू-शिष्य स्मारकाजवळ आ.अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनतर्फे आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्ज्वलित करत सहवेदना व्यक्त केल्या.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल, एबी फाउंडेशनच्या संचालिका अल्पा अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी भीमसिंह राजपूत, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, जि.प.च्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, महिला आघाडीच्या वैशाली शिरसाट, माजी नगरसेविका आरती पवार, प्रभा परदेशी, माजी महापौर प्रदीप कर्पे, जितेंद्र चौवटिया, शशी मोगलाईकर, महेश मिस्तरी, संजय बोरसे, यशवंत येवलेकर, नंदू सोनार, अरुण पवार, चेतन मंडोरे, भिकन वराडे, कमलाकर अहिरराव, पवन जाजू, पृथ्वीराज पाटील, दिनेश पारख, राजेंद्र अग्रवाल, प्रमोद चौधरी, प्रा. सागर चौधरी, चंद्रकांत महाजन, किरण जोंधळे, शिवाजीराव चौधरी, अमित पवार, महेश मुळे, ॲड. किशोर जाधव, विकी परदेशी, किशोर चौधरी, विजय पवार, अनिल सोनार, निलेश देसले, प्रीतेश अग्रवाल, बिपीन रोकडे, तुषार भागवत, महेंद्र भामरे, रामा भडागे, मोहित देसले, करण लोंढे, लोकेश चौधरी, भटू गवते, सुनील कोठावदे, अमोल सूर्यवंशी, विनायक अहिरे, उमेश चौधरी, सचिन मराठे, राहुल चौधरी, अमोल मराठे, जयेश वावदे, राहुल परदेशी, देविदास लोणारी, निलेश राजपूत, भीमा शर्मा, अशोक माळी, रमेश करनकाळ, नंदू ठोंबरे, जीवन शेंडगे, जयंत वानखेडकर यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.