Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मंजूर
    जळगाव

    केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मंजूर

    saimat teamBy saimat teamNovember 10, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मंजूर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (हवामानावर आधारीत)सन २०२०-२१ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई फक्त १३५०० रुपये देण्यात आली असून उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी होती. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने निकषानुसार भरपाई द्यावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषी आयुक्त यांचेकडे केली होती. खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी पत्र क्र.36734 दि.9 नोव्हेंबर 2021 च्या पत्रान्वये विभागीय व्यवस्थापक बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांना रु.22500/- प्रति हे. या प्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करण्याचे आदेश दिले असून रु. 13500/- प्रति हे. ची नुकसान भरपाई चुकीची असून रु.9000/- प्रति हे. चा फरक तात्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून वाढीव नुकसान भरपाई मिळणार आहे.

    अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे तीन कोटींची नुकसान भरपाई मिळाली वाढवून
    खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सातत्याने केळी पीक विमाधारक शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी प्रसंगी आवाज उठवला आहे. आपल्या अभ्यासपूर्ण पाठपुरावा आणि पत्रव्यवहारातून खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सात्यत्याने केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज देखील 3091 शेतकऱ्यांना सुमारे 3.00 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाढवून मिळाली आहे. यामुळे केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आभार मानले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : बसस्थानक आवारातून दोन तरूणांचे मोबाईल लांबविले

    December 25, 2025

    Jalgaon : एकाच दिवसात ११०० वाहनांवर कारवाई

    December 25, 2025

    Jalgaon : रायपुरला ग्रामस्थ त्रस्त, ग्रामपंचायत मस्त

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.