Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगावात उष्णतेचा कडाका वाढला; तापमान ४१.६ अंशांवर, पुढील काही दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा
    जळगाव

    Jalgaon : जळगावात उष्णतेचा कडाका वाढला; तापमान ४१.६ अंशांवर, पुढील काही दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा

    saimatBy saimatApril 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / जळगांव

    शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच उन्हाने आक्रमक रूप धारण केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर वर्दळ कमी होत असून अनेक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी ४३.७ अंश तापमानाची नोंद झाली होती. मात्र यंदा ११ एप्रिललाच पाऱ्याने ४० अंश ओलांडल्याने उष्णतेची तीव्रता लवकर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

    सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे मुख्य बाजारपेठा आणि महामार्गांवरील वर्दळ दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत उकाड्याचा कळस गाठला जात असून संध्याकाळी ७ वाजल्यानंतरही उष्णतेची झळ कायम राहत आहे. नागरिक उन्हापासून बचावासाठी टोपी, रुमाल आणि स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत.

    आता पुढे काय?
    हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच येत्या सहा दिवसांत तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून ‘उष्णतेची लाट’ कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात बाजार बंदीचे आदेश

    April 13, 2026

    Paladhi : पाळधी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रतापराव पाटील ठरले ‘देवदूत‘

    April 13, 2026

    Maharashtra Monsoon : मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.