साईमत / नवी दिल्ली
एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यमांमध्ये अशी अफवा पसरली होती की, केंद्र सरकारने एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून ३५ दिवसांपर्यंत वाढवला आहे. या वृत्तांनुसार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजने (PMUY) अंतर्गत कनेक्शनसाठी ४५ दिवस आणि PMUY नसलेल्या सिंगल-सिलेंडर व डबल-सिलेंडर कनेक्शनसाठी २५ आणि ३५ दिवसांपर्यंत बुकिंगची मुदत वाढवली जात आहे, असा दावा केला जात होता.
सरकारने फेटाळले अफवे पण केंद्र सरकारने या वृत्तांना फेटाळून स्पष्ट केले आहे की, एलपीजी रिफिल बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरी भागात २५ दिवसांच्या आत आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या आतच एलपीजी रिफिल बुक करता येईल.
सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका. गरज नसताना किंवा घाबरून एलपीजी रिफिल बुक करणे टाळावे. देशात एलपीजीचा पुरेसा साठा आहे आणि पुरवठा सुरळीत आहे.
पेट्रोल आणि डिझेल पुरवठा सामान्य : याचबरोबर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने आपल्या अधिकृत खात्यावर स्पष्ट केले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याचे वृत्त निराधार आहे. देशात पुरेसा तेलसाठा असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सामान्य आहे. बीपीसीएल सर्वांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करत आहे.
