Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Rabbi Season in December : रब्बी हंगामात सोडले जाणारे पहिले आवर्तन डिसेंबरला सोडावे
    कृषी

    Rabbi Season in December : रब्बी हंगामात सोडले जाणारे पहिले आवर्तन डिसेंबरला सोडावे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 10, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयावर शिवसेना उबाठाची धडक

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    रब्बी हंगामात पहिले आवर्तन जानेवारीला सोडतात, ते डिसेंबरला सोडावे, अशी मागणी घेऊन शिवसेना उबाठा गटाच्या शिष्टमंडळाने माजी खासदार उन्मेश पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, १० सप्टेंबर रोजी येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली.

    गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडल्याने पाणी वाहून जात आहे. काही शेतकऱ्यांच्या पिकांची २१ दिवसाच्या खंडात वाढ खुंटली आहे. गेल्या १६ ऑगस्टला एका दिवसात ढगफुटीसारखा पाऊस पडून शेतकरी संकटात सापडला आहे. म्हणून नदीत पाणी न सोडता थेट जामदा व दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे चाऱ्यामध्ये सोडल्यास रब्बीचे पीक चांगले येण्यासाठी शक्यता आहे. म्हणून उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता भोसले यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांनी लागलीच धरणगावचे उपकार्यकारी अभियंता तुषार राजपूत यांना कॅनल रिपेअर करून दोन दिवसात पाणी सोडावे, असे भ्रमणध्वनीवरुन सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर भरणासाठी फायदा होईल. रब्बी हंगामासाठी विहिरींना पुरेसे पाणी येईल. आज २० हजार हेक्टरऐवजी १२ हजार हेक्टरला पाणी देतात. परंतु ८ हजार हेक्टरला पाणी का पोहचत नाही. त्यांच्यासाठीही उपाय योजना करावी, असे सांगितले.

    शिष्टमंडळात यांचा होता सहभाग

    शिष्टमंडळात माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते उन्मेश पाटील, शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा तथा नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, महानगर प्रमुख शरद तायडे, भाऊसाहेब सोनवणे, प्रशांत सुरडकर, प्रमोद घगे, राकेश घुगे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, दिनेश बोरसे (चाळीसगाव), निलेश महाजन, चंद्रकांत शर्मा, प्रशांत परदेशी, मकबूल पठाण (भुसावळ) यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jamner:नाचनखेडा येथे पशुपालकांनी ‘चारा लावा, पशुधन वाढवा’ कार्यक्रम उत्साहात

    December 31, 2025

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Muktainagar:स्व. निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त आदिशक्ती मुक्ताई सूतगिरणीत अभिवादन

    December 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.