Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Terrible Accident In Uttarkashi : उत्तरकाशीत भीषण दुर्घटना : जळगाव जिल्ह्यातील १९ भाविक अडकले, संपर्कात केवळ ३ जण
    जळगाव

    Terrible Accident In Uttarkashi : उत्तरकाशीत भीषण दुर्घटना : जळगाव जिल्ह्यातील १९ भाविक अडकले, संपर्कात केवळ ३ जण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 7, 2025Updated:August 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    उत्तरकाशीमध्ये घडलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर जळगाव जिल्ह्यातील १९ भाविक अडकले आहे. त्यात विविध तालुक्यांतील नागरिकांचा समावेश आहे. अशा भाविकांपैकी केवळ तीन जणांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. त्यापैकी उर्वरित १६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    उत्तरकाशी येथे काही दिवसांपूर्वी अचानक भूस्खलन व मुसळधार पावसामुळे काही रस्ते पूर्णतः बंद झाले. ज्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील १९ जण अडकल्याचे समोर आले आहे. त्यात जळगाव शहरातील तीन, पाळधी गावातील १३, धरणगाव येथील दोन आणि पाचोरा येथील एका जवानाचा समावेश आहे. जळगाव शहरातील आयोध्या नगरमधील मेहरा कुटुंबातील तिघांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याचे समजते. मात्र, इतर १६ जणांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

    विशेष बाब म्हणजे अडकलेल्या भाविकांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील १३ जणांचा समावेश आहे. त्यामुळे ही घटना अधिक गंभीर झाली आहे. दरम्यान, पाचोरा येथील जवान सोपान अहिरे हे अडकल्यांमध्ये आहे. त्यांची चिंता स्थानिक पातळीवर अधिक वाढली आहे. धरणगावमधील दोन जण आणि इतर तालुक्यातील भाविकांनी उत्तरकाशीत यात्रा करण्यासाठी प्रयाण केले होते.

    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

    जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेनंतर तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचे विविध प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन सोशल मीडियासह स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणांच्या साहाय्याने तपशील जमा करत आहे. अडकलेल्या नागरिकांचे नावे, संपर्क क्रमांक आणि प्रवासाचा तपशील संकलित करून राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी सतत समन्वय साधण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न

    December 31, 2025

    Jamner:नाचनखेडा येथे पशुपालकांनी ‘चारा लावा, पशुधन वाढवा’ कार्यक्रम उत्साहात

    December 31, 2025

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.