decrease in water : हतनूरमध्ये यंदा तीन टक्के जलसाठ्यात घट

0
34

हतनूरमध्ये यंदा तीन टक्के जलसाठ्यात घट

जळगाव (प्रतिनिधी )

जळगाव जिल्ह्यात एप्रिलमध्येच तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या हतनूर धरणात तर गतवर्षी 47.6 टक्के होता. मात्र यावर्षी हातनूर धरणात फक्त 44.78 टक्के जलसाठा शिल्लक आहे. म्हणजेच हतनूरमध्ये यंदा सुमारे तीन टक्के जलसाठ्यात घट झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, जामनेर व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. या चार तालुक्यांतील सात गावांमध्ये आठ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणीटंचाईमुळे विहिरींच्या अधिग्रहणालाही गती देण्यात आली असून, एरंडोल तालुक्यात 1, मुक्ताईनगरमध्ये 4, पाचोरामध्ये 4, चाळीसगावमध्ये 4 आणि अंमळनेर तालुक्यात 8 अशा 31 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here