साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. याच पाश्र्वभूमीवर, जळगाव तालुक्यातील वावडदा गावाजवळ एक भीषण अपघात (accident) घडला, ज्यात दुचाकीवरील (bike accident)दोघे तरुण जागीच मृत्यूमुखी पडले आणि एक गंभीर जखमी झाला.
या अपघातात भावेश गोरख पाटील (वय ३८) आणि महेंद्र उर्फ योगेश वसंत जाधव (वय ३८), दोन्ही जळगाव तालुक्यातील पाथरी गावाचे रहिवाशी, उद्योगाच्या कामानिमित्त संदीप शांताराम भील (वय ३५) यांच्यासोबत पाथरीतून जळगावकडे जात होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने (Pickup vehicle accident) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली, ज्यामध्ये भावेश पाटील आणि महेंद्र जाधव यांना जागीच मृत्यू आला. तर संदीप भील गंभीर जखमी झाला आहे.
घटना घडल्यानंतर, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून भावेश पाटील आणि महेंद्र जाधव यांना मृत घोषित केले, तर संदीप भील याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
भावेश पाटील हे खाजगी लक्झरी बसवर चालक म्हणून काम करीत होते, त्यांच्या पश्चात त्यांची आई आहे. तर महेंद्र जाधव हे टेलरिंग काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी अशी कुटुंब व्यवस्था आहे.
या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. राज्यात असे अपघात घडत असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरक्षितता आणि रस्ते सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.