Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»यावल परिसर शेळगाव बॅरेज प्रकल्पामुळे समृद्ध होणार
    कृषी

    यावल परिसर शेळगाव बॅरेज प्रकल्पामुळे समृद्ध होणार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणाच्या जलपूजनप्रसंगी आ.शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिपादन

    साईमत/रावेर/विशेष प्रतिनिधी

    शेळगाव धरणाच्या निर्मितीत अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. त्यामुळे यावल तालुका हा खऱ्या अर्थाने सुजलाम्‌-सुफलाम्‌ होणार आहे, असे प्रतिपादन आ. शिरीषदादा चौधरी यांनी केले. ते धरणाच्या जलपूजन केल्यानंतर बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रमेश चौधरी, श्रीराम पाटील, प्रभाकर सोनवणे, लिलाधर चौधरी, अतुल पाटील, इंजिनिअर प्रकाश पाटील, जनाबाई महाजन, शेखर पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद‌ बोंडे, जगदीश कवडीवाले, अनिल महाजन, चंद्रकला इंगळे, प्रभाकर झोपे, शरद कोठी, डॉ.सुरेश पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, मुकेश येवले, हरिश गणवाणी, गोंडू महाजन, आत्माराम शंकोपाळ, सतिष पाटील, हयात शेठ, जावेद जनाब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अनेक मान्यवरांनी प्रयत्न केले. आ.नाथाभाऊंनी धरणाची मुर्हूतमेढ रोवली. नंतरच्या काळात मी २००९ ते २०१४ मध्ये आमदार असतांना मुख्यमंत्र्यांकडे अनेक बैठका घेतल्या. निधी मंजूर करुन घेतला. नंतरच्या काळात स्व. हरिभाऊ जावळे यांनी प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाचा समावेश बळीराजा संजीवनी योजनेत केला. त्यामुळे प्रकल्पाला केंद्राचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ना. गिरीषभाऊ महाजन हे जलसंपदा मंत्री असतांना त्यांनी दोन वेळा प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली.

    जलपूजन करतांना मनस्वी समाधान

    आताच्या काळात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रकल्पाच्या अंतर्गत असलेली यावल उपसा जलसिंचन योजना मंजूर करुन घेतली. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. मी बुडीत क्षेत्रात जाणारे तीन ठिकाणचे पूल मंजूर करुन घेतले. त्यातील दोन पूल बांधून पूर्ण झाले. अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या व प्रयत्नाने आज हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. अशा प्रकल्पाचे जलपूजन करतांना मनस्वी समाधान आहे. तालुक्याला सुजलाम्‌- सुफलाम्‌ करणारा शेळगाव बॅरेज प्रकल्प असल्याचेही आ.शिरीषदादा चौधरी म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.