शिक्षकांच्या सत्काराप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांचे प्रतिपादन
साईमत/यावल, फैजपूर/प्रतिनिधी :
शिक्षक हे कोणाचेही गुलाम नाहीत तर ते युवा पिढीवर संस्कार घडवणारे आणि भारताची भावी पिढी घडवणारे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले. आश्रय फाउंडेशन, यावलच्यावतीने फैजपूर येथे रावेर-यावल तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फैजपूरच्या खंडोबा वाडी देवस्थान परिसरात भावपूर्ण सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प.पू.पवनदास महाराज, पी.एस.सोनवणे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कोळी (न्हावी), मुख्याध्यापक दिलीप पाटील (अभोडा) आणि जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जितेंद्र पाटील (मोरगाव) आणि दीपक चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. पराग पाटील, डॉ. भरत महाजन, डॉ. सोहन महाजन, डॉ.विलास पाटील, संदिप भारंबे, कन्हैया चौधरी, शुभम तांबट, राम शिंदे उपस्थित होते.
मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही केले सन्मानित
कार्यक्रमात उपस्थित सर्वच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास यावल – रावेर तालुक्यातून शेकडो मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आश्रय फाउंडेशनचे सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गिरीशा कोळी तर अश्विनी कोळी यांनी आभार मानले.