Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वरणगाव»वरणगावातील ‘भोगावतीला’ पूर : पूर पाहण्यासाठी उसळली गर्दी
    वरणगाव

    वरणगावातील ‘भोगावतीला’ पूर : पूर पाहण्यासाठी उसळली गर्दी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    व्यापारी संकुलात पाणी घुसल्याने व्यवसायिकांचे नुकसान

    साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :

    बोदवड तालुक्यातील उजनी येथे उगमस्थान असलेल्या भोगावती नदीला सोमवारी, २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मोठा पूर आला. त्यामुळे वरणगाव शहरातील नदी पात्रालगतच्या व्यापारी संकुलात पाण्याचा शिरकाव झाल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले. बऱ्याच वर्षानंतर नदीला पूर आल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.

    वरणगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून भोगावती नदी आहे. नदीचे उगमस्थान बोदवड तालुक्यातील हिंदू – मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत न्यामतुल्ला शाह वली पिर बाबा दर्गा उजनी येथुन आहे. नदीला ५० वर्षांपूर्वी बाराही महिने शुद्ध स्वरूपाचे पाणी वाहत होते. मात्र, काळाच्या ओघात नदीचे स्वरूप बदलले आहे. पावसाळ्याच्या दिवसात बोदवड तालुक्यातील उजनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास नदीला पूर येतो. तसेच नदीच्या पुराने अनेकांचे जीव (भोग) घेतले असल्याने नदीला भोगावती, असे संबोधले जात असल्याचे सांगितले जाते.

    भोगावती नदीला सोमवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पूर आल्याने भोगावती नदी पात्रालगत रहिवाशी असलेल्या सुफियाबी शेख शेरू, संजय बाबुराव कोळी यांच्या प्रत्येकी दोन बकऱ्या वाहून गेल्या. तसेच अहमद कुरेशी यांचा बांधलेल्या बैलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रेणुका माता मंदिराच्या पायऱ्याजवळ पाणी आल्याने या भागात असलेल्या नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले. याबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शिवसेनेचे शेख सईद शेख भिकारी, राष्ट्रवादीचे समाधान चौधरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी शासनाकडे पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

    भोगावतीला १५ वर्षानंतर आला पहिलाच पूर

    भोगावती नदीला किमान १५ वर्षानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर आल्याची माहिती कर्णोपकर्णी पोहचताच पूर पाहण्यासाठी नदी पात्रालगत नागरिकांची गर्दी उसळली होती. पुराचे पाणी नदी पात्रालगत बांधण्यात आलेल्या नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयातही शिरले होते. तसेच पुराच्या पाण्याने आठवडे बाजारातही शिरकाव केला होता. मात्र, काही तासातच पुराचे पाणी ओसरल्याने नदी पात्रालगतच्या रहिवाशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Medical Superintendent : वैद्यकीय अधीक्षकांनी स्वतः रुग्णवाहिका चालवून दिला सेवानिवृत्त चालकाला निरोप

    June 2, 2025

    Nageshwar Temple : नागेश्वर मंदिर संस्थेच्या जागेचा वाद चव्हाट्यावर

    May 30, 2025

    30 thousand surgeries : डॉ. नि. तु. पाटील यांचा ३० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

    April 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.