Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नेपाळ दुर्घटनेवर संवेदनशील फुंकर अन्‌ रक्षाताईंच्या तत्परतेची पंतप्रधान दखल घेतात तेव्हा…
    जळगाव

    नेपाळ दुर्घटनेवर संवेदनशील फुंकर अन्‌ रक्षाताईंच्या तत्परतेची पंतप्रधान दखल घेतात तेव्हा…

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘रक्षाताईंच्या तत्परतेस सलाम…!’ मथळ्याखाली प्रसिध्द केलेला मजकूर समाज घटकात प्रचंड प्रमाणात व्हायरल

    नेपाळमधील बस दुर्घटनेत जिल्ह्यातील ज्या २५ जणांनी जीव गमावला. त्यांचे कुटुंबिय विरहाच्या दु:खातून अद्यापही सावरलेले नाही. मात्र, रविवारी जळगावमधील ‘लखपती दीदी’ समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या दुर्घटने दुर्घटनेबद्दल ज्या शब्दात पिडा व्यक्त केली, त्यातून त्यांच्यातील संवेदनशिलतेचे आणि लोकांप्रतीच्या आत्मनियतेचे दर्शन घडले. त्या दुर्घटनेविषयी बोलतांना ते पुढे म्हणाले, दुर्घटनेची माहिती मिळताच नेपाळ सरकारशी संपर्क साधण्यात आला आणि आमच्या केंद्रीयमंत्री रक्षाताई यांना तातडीने नेपाळला जाण्याचे सांगितले. दुर्घटनेतील मृतदेह वायुसेनेच्या विमानाने येथे आणण्यात आले आणि जे जखमी आहेत. त्यांच्यावर चांगल्या पध्दतीने उपचार सुरु आहेत. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला श्री.मोदींनी ‘इसी धरती की संतान बहन रक्षाताई खडसे’ असा उल्लेख करुन जणू ताईंच्या तत्परतेची एका प्रकारे दखल घेतली असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. रक्षाताईंच्या तत्परतेसंदर्भात जिल्ह्यातील विविध समाजघटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. विशेषत दै. ‘साईमत’मध्ये ‘रक्षाताईंच्या तत्परतेस सलाम…!’ या मथळ्याखाली प्रसिध्द केलेला मजकूर समाज घटकात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून रक्षाताईंनी ज्या जबाबदारीने आपले कर्तव्य निभावले. त्याबद्दल समाजात चांगला संदेश तर गेलाच पण त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही उत्सफूर्त भावना व्यक्त केल्या गेल्या. अशा असंख्य प्रतिक्रिया आज उमटल्या. त्यातील उदाहरण म्हणून वरणगाव-फुलगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी यांची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे.

    श्री. चौधरी म्हणाले, दुसऱ्या देशातून मृतदेह तातडीने येथे आणणे आणि तेथे (नेपाळ) जखमी असलेल्यांसाठी तेवढ्याच तत्परतेने औषधोपचाराची सुविधा करणे हे खूप मोठे काम आहे. जनतेचा लोकप्रतिनिधी कसा असावा, हे रक्षाताईंच्या रुपाने अनुभवास आला. नेपाळचे गृहमंत्री पूर्णवेळ रक्षाताई बरोबर होते. त्यांनाही ताईंच्या संवेदनशिलतेबद्दल अप्रुप वाटले.

    -सुरेश उज्जैनवाल, कार्यकारी संपादक

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.