Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»केळीसाठी जिल्हाधिकारी प्रसाद अभ्यासूरित्या अँक्शन मोडवर सुचवले दीर्घकालीन पर्याय : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
    कृषी

    केळीसाठी जिल्हाधिकारी प्रसाद अभ्यासूरित्या अँक्शन मोडवर सुचवले दीर्घकालीन पर्याय : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

    SaimatBy SaimatJuly 30, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / न्यूज नेटवर्क / रावेर

    केळीचे भाव निश्चित करतांना जळगाव व बऱ्हाणपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांनी समन्वय साधावा,व्यापाऱ्यांकडून बँक हमी घेऊन परवना द्यावा व केळी उत्पादकांना ठगवणाऱ्या बोगस व्यापाऱ्यांवर समित्यांनी कठोर कारवाई करावी अशाउपाययोजना अंमलात येतील यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अभ्यासूरित्या अँक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने आयोजित आजचे चर्चासत्र केळी उत्पादकांना काही अंशी दिलासा देणारे ठरले.

    रावेर येथे माजी सैनिक हॉल मध्ये केळीला स्थिरभाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्राला
    फैजपूर विभागाच्या सहायक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णासिंह, जिल्हा कृषी अधिक्षक कुर्बान तडवी, बऱ्हाणपूर बाजार समितीचे सचिव महेंद्रसिंह,रावेर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील,उपसभापती योगेश पाटील,एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी,माजी जि.प.सदस्य नंदकीशोर महाजन,भाजप जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांचा प्रमुख सहभाग होता.
    प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी केळीबाबत शेतकरी व व्यापारी यांचेकडून निर्माण होणाऱ्या समस्या व नियमित उद्भवणारे प्रश्न समजून घेतले.चर्चासत्रात नंदकिशोर महाजन यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनावर भर द्यावा,सुरेश शिंदे यांनी केळीचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा,अरविंद गांधी यांनी एक बीलं पद्धत लागू करावी,छोटू पाटील यांनी व्यापाऱ्यांनी तीन टक्के कट्टी लावल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी,सुरेश धनके यांनी लिलाव पद्धत सुरू व्हावी,राजीव पाटील यांनी ८० टक्के व्यापारी बोगस असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा,विशाल अग्रवाल यांनी व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय नसणे यासह पाणंद रस्त्यांच्या अडचणी मांडल्या.माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी,कृऊबा संचालक प्रल्हाद पाटील,पितांबर पाटील, योगिराज पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, प्रणित महाजन,सुरेश पाटील, यांचेसह शेतकरी व्यापारी यांनी सुद्धा अनुषंगिक प्रश्न उपस्थित केले.त्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संगोपांग चर्चा करून अगदी मुद्देसूद व अभ्यासूरित्या उपाययोजना सुचवल्या.

    जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवल्या उपाययोजना :

    >> बऱ्हाणपूर,रावेर,यावल,चोपडा बाजार समिती यांनी एकत्रित व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केळी भाव निश्चित करावेत.
    >> केळीची चक्राकार पद्धतीने लागवड व्हावी.
    >> हापुस आंबा,केसर आणि सफरचंद खरेदीप्रमाणे केळी खरेदी करण्यासंबंधी अभ्यास करून त्याच धर्तीवर केळी विक्री धोरण तयार करावे.
    >> केळी पीक सिंगल प्रॉडक्ट न ठेवता विशेषतः मल्टी प्रॉडक्ट करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा.
    >> जिल्ह्यातील व बऱ्हाणपूर बाजार समित्यांनी मिळून केळी भाव एक राहिल यासाठी समन्वय ठेवावा.
    >> सर्व व्यापाऱ्यांचे रजिस्ट्रेशन असावेत त्यासाठी बँक गॅरंटी लागू करावी.
    >> बोगस व्यापारी शोधून समित्यांनी अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
    >> तीन किलो कट्टीचा निर्णय समन्वयाने सोडवावा.
    >> व्यापारी व शेतकरी यांच्यातील स्पर्धेचे वातावरण नष्ट करावे.केळीचे भाव वाढण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन बाजार समितीत्यांनी नियोजन करावे.

    यांची होती उपस्थिती :

    रावेर बाजार समितीच्या वतीने केळी उत्पादकांना दिलासा देणाऱ्या या चर्चासत्राला कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके,निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, व्यापारी संजय अग्रवाल,नितीन पाटील,संतोष पाटील,रमेश वैदकर,विनोद पाटील,बाजार समिती संचालक डॉ.राजेंद्र पाटील,राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, जयेश कुयटे,मंदार पाटील,सैय्यद असगर आदींची उपस्थिती होती.

    लिलावासाठी नव्याने समिती :

    केळी लिलाव प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चासत्रात ठोस निर्णय न झाल्याने बाजार समितीकडून केळी भाव काढण्यासाठी नव्याने समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.यात सभापती, सचिव,तीन व्यापारी,दोन संचालक यांच्या समावेश असलेली समिती गठीत करणार आहे.तर नोंदणीकृत व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी माल द्यावा असे आवाहन सभापती सचिन पाटील यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Breaking : बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीत आढळला; ‘घातपात’चा संशय, रावेर तालुक्यात खळबळ

    December 17, 2025

    Savada : सावदा येथे ५३ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा

    December 15, 2025

    ‘Sudden Drinking Water Reservation’ : जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर

    December 6, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.