Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसाला जगण्याचा मंत्र दिला – बापुराव पानपाटील
    जळगाव

    छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसाला जगण्याचा मंत्र दिला – बापुराव पानपाटील

    SaimatBy SaimatFebruary 20, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाही तर माणसाला जगण्याचा मंत्र दिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले. त्यात त्यांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना करुन गरीब जनतेला न्याय मिळवून दिला. जीवनातील प्रत्येक प्रसंगाना ते धैर्याने समोरे गेले, कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. असे प्रतिपादन बापुराव पानपाटील यांनी केले.

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड, पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ. मिलिंद बागुल,डॉ. सत्यजित साळवे, बापुराव पानपाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
    यावेळी शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर बोलतांना डॉ. सत्यजित साळवे यांनी महाराजांचे विश्वासू साथीदार शिवाजी काशीद यांचा प्रसंग कथन केला. ते म्हणाले की, शिवाजी काशिद, बर्हिजी नाईक, तानाजी मालुसरे या लोकांना काही मोठा खजिना मिळाला नाही. पण त्यांना प्रेम मिळाले, प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यांनी कुणालाही उघड्यावर पडू दिले नाही. हा संदेश आत्ताच्या राज्यकर्त्यांनी शिवचरित्रातून घ्यायला हवा असेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

    डॉ मिलिंद बागुल यांनी सांगितले की,इतिहास म्हणजे भूतकाळाचा वर्तमान काळशी चालेला सुसंवाद असून या वर्तमान काळातही आपल्या हातून इतिहास घडत असतो. परंपरा आणि आधुनिकता सृजनांना जन्म देत असते. मात्र त्या परंपरेची जाण आणि भान आपण राखले पाहिजे. कारण चुकीचा इतिहास समाजात अंधश्रध्दांना जन्माला घालण्याचे काम करीत असतो.
    सुत्रसंचालन नरेश बागडे, यांनी तर आभार विनोद निकम यांनी मानले. या प्रसंगी अजय बागडे, यशवंत पाटील, सरदार राजपुत, नारायण येवले, देविदास पाटील, विजय चव्हाण, भैय्यासाहेब बोरसे, विठ्ठल जाधव, प्रकाश जाधव, निलेश जोशी, उदय महाले, गौतमी महीला संघाच्या अध्यक्ष संगिता भालेराव, आशा बागडे, नंदिता जोशी, ज्योती निकम, योगिता पाटील, संगिता कोळी, सुनिता राजपूत, सिंधुताई जाधव, भारती जाधव, पुनम जाधव, वंदना बांगर, मंगला सोनवणे, मिना हिवाळे, सोनाली सोनावणे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी १२ कोटींचा क्रीडांगण विकास निधी मंजूर

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : ‘ऑपरेशन मुस्कान’ला यश: कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता १५ वर्षीय मुलगी

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : गुजरातमध्ये पत्नीच्या उपचारात गेलेल्या निवृत्त सोनाराचे घर साफ

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.