Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांना धमकी, मारहाण ; काँग्रेसतर्फे निषेध
    जळगाव

    जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांना धमकी, मारहाण ; काँग्रेसतर्फे निषेध

    SaimatBy SaimatFebruary 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. जळगाव जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार, सरकारी डॉक्टर्स यांना गुंडांकडून धमक्या येणे, मारहाण होणे या घटना वाढत आहेत. या गुंडांमध्ये एवढी हिम्मत आली कुठून ? असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांचे गुंडांना अभय असल्याचा आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे.

    अधिकाऱ्यांवरील मारहाणीचा व धमक्यांचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. जिल्ह्यात तिन्ही मंत्री निष्क्रिय असून सत्ताधाऱ्यांमुळेच गुन्हेगार मुजोर होत असल्याचेहि प्रदीप पवार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जळगाव तहसीलदार शीतल राजपूत यांच्या वाहनाचाही काही दुचाकीस्वार तरुणांनी पाठलाग केला होता. याबाबतचा विडिओ खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच माध्यमांना दिला होता. तसेच, रावेर तालुक्यातही तलाठीला धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणण्यात आला. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह डॉक्टरांना मारहाण करण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. या सर्व घटना आता १५ दिवसातल्या आहेत.
    या घटनेतून स्पष्ट दिसते की, सरकारी अधिकारीदेखील आता दहशतीत असून किरकोळ गुंडदेखील धमक्या देण्याचे गम्भीर प्रकार करीत आहेत. त्यांच्यावर कुणाचा अंकुश दिसत नाही. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. मात्र त्यांचे मौन खूप काही सांगते. या गुंडांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे अभय तर नाही ना असा सवाल जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, यांनी केला आहे. दोषी गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. जनतेला असुरक्षित वाटणारे हे सरकार आता सरकारी अधिकाऱ्यांनादेखील असुरक्षित झाले आहे. राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरले असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असेही जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी १२ कोटींचा क्रीडांगण विकास निधी मंजूर

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : ‘ऑपरेशन मुस्कान’ला यश: कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता १५ वर्षीय मुलगी

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : गुजरातमध्ये पत्नीच्या उपचारात गेलेल्या निवृत्त सोनाराचे घर साफ

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.