साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील वाडी चौक परिसरात अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी राम विठ्ठल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानिमित्त संत सखाराम माऊली मित्र मंडळातर्फे ‘एक शाम राम के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चांगल्या देखाव्यालाही लाजवेल अशी सजावट केली होती. सायंकाळी संपूर्ण परिसरात दिवे लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात सडा टाकून सुंदर अशी रांगोळी टाकण्यात आली होती.
यावेळी भाऊ एडके, केशव पुराणिक, शारंगधर गुरुजी, प्रशांत जोशी, साहिल जोशी आणि ज्ञानेश्वर पाठशाळेचे विद्यार्थी यांनी रामरक्षा स्तोत्र आणि शांती पाठाचे वाचन केले. टाळ, मृदुंगांच्या गजरात संपूर्ण परिसर संगीतमय झाला. ‘रामराज्य काय उन्ये आम्हासी’ अशा आशयाच्या अभंगाने वारकरी शिक्षण पाठशाळेच्या विद्यार्थिनी म्हटलेल्या अभंगाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडुरंगाच्या मूर्तीला आकर्षक सुंदर फुलांची मनमोहक सजावट केली होती.
प.पू.प्रसाद महाराज विठ्ठल रुखुमाई संस्थान अमळनेर यांचे आशीर्वाद लाभले. फटाक्यांची आतिबाजी करण्यात आली. वाडी चौकात लावलेल्या भव्य आकाशकंदील लक्ष वेधून घेत होता. मंदिर परिसरात भगवे ध्वज लावून संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भाविकांसाठी श्रीरामाची प्रतिकृतीही उभारण्यात आली होती. दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने संपूर्ण परिसर लखलखाटत होता. यशस्वीतेसाठी माऊली मित्र मंडळ, नेताजी मित्र मंडळ आणि परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.