Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भारताच्या लेकींचा ऑस्ट्रेलियावर कसोटी मालिकेत पहिलाच शानदार विजय
    क्रीडा

    भारताच्या लेकींचा ऑस्ट्रेलियावर कसोटी मालिकेत पहिलाच शानदार विजय

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    भारतीय महिला क्रिकेट संघाने मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला.या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा आणि दुसऱ्या डावात २६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४०६ धावा आणि दुसऱ्या डावात २ गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली.
    या अटीतटीच्या कसोटीत भारतीय संघाचा दबदबा कायमच राहिला. पहिल्या डावात २१९ धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. यादरम्यान ताहिल मेग्रॅथने अर्धशतक झळकावले. तिने ५६ चेंडूंचा सामना करत ५० धावा केल्या. मुनीने ४० धावांची खेळी खेळली. दुसऱ्या डावात २६१ धावा करून संघ सर्वबाद झाला. ताहिलाने दुसऱ्या डावात १७७ चेंडूंचा सामना करत ७३ धावा केल्या.या दरम्यान १० चौकार मारले. संघासाठी एलिस पेरीने ४५ धावांचे योगदान दिले.
    भारताकडून पूजा वस्त्राकरने पहिल्या डावात ४ विकेट घेतल्या. तिने १६ षटकात ५३ धावा दिल्या तर स्नेह राणाने २२.४ षटकात ५६ धावा देत ३ विकेट घेतल्या. दीप्ती शर्माने २ विकेट घेतली. स्नेहने दुसऱ्या डावात ४ विकेट घेत २२ षटकात ६३ धावा दिल्या.राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीतनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूजाला एक विकेट मिळाली.
    टीम इंडियाने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ४०६ धावा केल्या होत्या. सलामीवीर मानधनाने १०६ चेंडूंचा सामना करत ७४ धावा केल्या. तिने १२ चौकार मारले. शफाली वर्माने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रिचा घोषने १०४ चेंडूंचा सामना करत ५२ धावा केल्या. तिने ७ चौकार लगावले. जेमिमाह रॉड्रिग्जने ७३ धावांची शानदार खेळी केली. दीप्ती शर्माने ७८ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने ४७ धावा केल्या.
    भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत विजयासाठी अवघ्या ७५ धावांचे लक्ष्य दिले गेले. टीम इंडियासाठी मंधानाने दुसऱ्या डावात नाबाद ३८ धावा केल्या. तिने ६१ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार लगावत शानदार कामगिरी केली. रिचा १३ धावा करून बाद झाली. जेमिमाने नाबाद १२ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने मुंबई कसोटी ८ गडी राखून जिंकली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Sports Sector Is Important : युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वाचे : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

    December 23, 2025

    Open Chess Tournament : जी. एच. रायसोनी ओपन बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

    December 22, 2025

    Kho-Kho Competition : खो-खो स्पर्धेच्या जिल्हा संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर, किरण बोदडे

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.