Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»भाजपसाठी वेगळी निवडणूक आचारसंहिता आहे का?
    मुंबई

    भाजपसाठी वेगळी निवडणूक आचारसंहिता आहे का?

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली, त्यावेळी आमचे पाच ते सहा आमदार निवडणूक आयोगाने बाद ठरवले होते. तसेच बाळासाहेबांच्या मतदानावर देखील निवडणूक आयोगाने बंदी घातलेली होती मग निवडणूक आचारसंहिता असताना रामलल्लाच्या मोफत दर्शनाचे आमिष दाखवणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवडणूक आयोगाने नियमातून सूट दिली आहे का?“ असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
    मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला मतदान केले तर रामलल्लाच्या दर्शनासाठी मोफत अध्योध्यावारी घडवेन, असे आमिष मतदारांना दाखवले. निवडणूक आचारसंहिता असताना मतदारांना अशी ऑफर देणं, आमिष दाखवणे हे कायद्यात बसतं का? यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याच मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. आज गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
    “निवडणूक आयोग जर विरोधी पक्षातल्या राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना त्यांच्या भाषणांवरून नोटीस पाठवत असेल तर ते काम करतायेत असे प्रथमदर्शनी वाटतेय तर हेच काम अमित शाह यांच्या भाषनांनंतर ते करणार आहेत का? की, त्यांच्यासाठी वेगळी आचारसंहिता निवडणूक आयोगाने तयार केली आहे?, असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला.
    “देशात काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. क्रिकेटमध्ये काही नियम असतात तशीच निवडणूक आचारसंहिता असते.काही शंकांवर खुलासा होण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. निवडणूक आयोगाचे धोरण अनेकदा असे दिसतेय की, भाजप सत्तेवर असल्यामुळे त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केलं तर आमची हिट विकेट काढायची. याला मुक्त वातावरणातल्या निवडणुका म्हणता येणार नाही“, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
    उद्धव ठाकरे म्हणाले, “देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशमध्ये प्रचार सभेत बोलताना भाजपाला मतदान केले तर मोफत अयोध्यावारी घडवीन, असे वक्तव्य केले. १९८७ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांनी निवडणूक लढवली. त्यावेळी आमचे सहा आमदार बाद ठरवले तसेच बाळासाहेबांच्या मतदानावर देखील सहा वर्षांची बंद घातली गेली. मग निवडणूक आचारसंहिता असताना रामलल्लाच्या मोफत दर्शनाचे आमिष दाखवणारे अमित शाह यांना निवडणूक आयोगाने नियमातून सूट दिली आहे का?

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    MPSC Exam Postponed : एमपीएससीची मोठी उलटफेर! 21 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा जाहीर

    December 8, 2025

    Split in the Grand Alliance : भाजप-शिंदे गट संघर्षात वाढ; २ डिसेंबरच्यानंतर मोठी हालचाल?

    November 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.