रसिकता अन्‌‍ सृजनशीलता निर्माण करणारे वाचन असावे

0
33

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

‘वाचनाने घडतो माणूस’ विषयांतर्गत वाचनातून निर्माण झालेली संस्कृती कुठेतरी लयास जात आहे. वाचन म्हणजे व्यवहारातून ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. काव्याचा रसास्वाद घेता आला पाहिजे. कलात्मक मनोरंजक भाषेतून वाचनाकडे पाहिले पाहिजे. संस्कारांची नीती मूल्यांची वाढ वाचनातून झाली पाहिजे. वाचन गरज बनली पाहिजे. वाचन हे पदवीपुरते नसावे तर वाचनातून आनंद प्राप्ती झाली पाहिजे. एकविसाव्या शतकात माहितीचा भस्मासुर आहे. वाचन हे रसिकता आणि सृजनशीलता निर्माण करणारे असावे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी केले. वाचनाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि रुसोची उदाहरणे दिली.

येथील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील होते. यावेळी प्रा डॉ. ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा डॉ. व्ही. एस. सोळुंके आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. जे.एफ. पाटील यांनी वाचनातून विद्यार्थी घडत असतात. विचारवंतांना ऐकण्याची संधी मिळते. वाचनाची प्रेरणा मिळत असते. अफाट वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते. त्यासाठी किमान रोज वाचन केले पाहिजे, असे सांगितले. ज्ञान वृद्धिंगत व जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन केले पाहिजे. वाचनाची त्रिसूत्री, शब्दसंग्रह वाढविण्याची कला, पेपर वाचणे या सर्व गोष्टी वाचनातून साध्य होतात. वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाचनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा हेतू त्यामागे असतो. ‘अग्निपंख’ वाचल्यावर त्यातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते. वाचनाची परंपरा असलेला आपला भारत देश आहे. विद्यार्थ्यांचा शब्द संग्रह वाढावा, यासाठी त्यांनी शब्दकोडी, विविध वृत्तपत्र, आत्मचरित्र -चरित्र, कादंबरी यासारख्या वाचनातून खूप काही प्रेरणा मिळते, असे प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमास प्रा.डॉ. एस.टी. धूम, प्रा.डॉ. किरण वारके, प्रा. डॉ. पी.ए. अहिरे, प्रा. डॉ. डी. एम.टेकाडे, प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा सचिन राजपूत, डॉ. ममताबेन पाटील, डॉ. स्मिता चौधरी, प्रा. संगिता भिरुड, प्रा.अक्षरा साबळे, प्रा.शितल सोनवणे, प्रा. प्रतिभा गलवाडे, प्रा. योगिता भंगाळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, मराठी विभागातील ज्येष्ठ प्रा. डॉ. के.के. अहिरे, प्रा. डॉ . दिनानाथ पाठक, प्रा. गौतम भालेराव, डॉ. स्वाती महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन तर आभार प्रा.वंदना महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here