Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»स्वत:च्या जाहिरातींवर उधळपट्टी करणाऱ्यांकडे रुग्णांच्या औषधासाठी पैसे नाहीत – उद्धव ठाकरे
    मुंबई

    स्वत:च्या जाहिरातींवर उधळपट्टी करणाऱ्यांकडे रुग्णांच्या औषधासाठी पैसे नाहीत – उद्धव ठाकरे

    SaimatBy SaimatOctober 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    शासकीय रुग्णालयांंमध्ये उपचार घेणाऱ्यांना बाहेरून औषधे आणायला सांगितली जातात.राज्य सरकारकडे स्वत:ची जाहिरात करायला पैसे आहेत.गुवाहाटी आणि गुजरातला फिरायला जाण्यासाठी पैसे आहेत मात्र सरकारी रुग्णालयांमधे उपचार घेणाऱ्या जनतेच्या औषधांंसाठी पैसे नाहीत.ही अत्यंत संतापनजक बाब आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने हे भ्रष्ट सरकार घालवले पाहिजे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
    यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूसत्रावरुन राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षाच्या मस्तवाल नेत्याने नांदेड रुग्णालयाच्या डीनला शौचालयाची साफसफाई करायला सांगितली. यामुळे डीनने संबंधित नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताच सूडाच्या भावनेतून डीनवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
    शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत असतील तर सरकारी योजनांचे पैसे त्यासाठी का वापरले जात नाहीत? कोरोनाची साथ असताना राज्यात औषधांचा इतका तुटवडा जाणवला नव्हता मग आता कोणतीही साथ नसताना राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा का जाणवत आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
    औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार
    उद्धव ठाकरे यांनी औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचेही सूतोवाच केले.हाफकिन संस्थेमार्फत सरकारी रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी केली जात असे मात्र आता राज्य सरकारने ही पद्धत बंद केली आहे.निविदा प्रक्रिया न राबवताच थेट औषध खरेदी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.यामुळे औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो. राज्य सरकारने एखाद्या दलालाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला आहे का?सरकारच्या या भ्रष्ट कारभारामुळे लोकांचे बळी जात आहेत त्यामुळे जनतेने हे सरकार घालवले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

    आरोग्यमंत्री फक्त पोस्टर्सवर
    शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूचे सर्व खापर डॉक्टरांवर फोडून चालणार नाही.रुग्णालयात औषधांचा तुटवडा असेल तर त्यामध्ये डॉक्टरांचा दोष नाही.टेंडरविना औषध खरेदी होत असेल तर भ्रष्टाचार होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार? राज्य सरकारकडे औषध खरेदीसाठी पैसे नसणे ही संतापजनक बाब आहे. इतके मृत्यू होऊनही राज्याचे आरोग्यमंत्री कुठेच दिसत नाहीत.ते फक्त पोस्टर्सवर दिसतात, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
    ३

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Air India flights cancelled : इराण संघर्षामुळे एअर इंडियाचे २,५०० उड्डाणे रद्द; विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला

    March 23, 2026

    jalgaon : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जळगाव मार्गावर धावणार अतिरिक्त गाड्या

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.