साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
धरणगाव तालुक्यातील पाळधी खु. गावातील मध्यवर्ती भागातील पथदिवे काही दिवसांपासून बंद होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे यासंदर्भात नागरिकांनी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आणि सरपंच शरद कोळी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ क्रेन मागवून त्वरित रात्री १० वाजता सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून हातोहात सर्व पथदिवे बदलण्याचे काम सुरू केले. तसेच पुढील टप्प्यात वानखेडे गॅरेज ते बायपासपर्यंत नवीन हायमस्ट पथदिवे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले.
जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी पथदिव्यांची तात्काळ दखल घेऊन काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी सरपंच शरद कोळी, चंदू माळी, भाईदास माळी, अमीन पटेल, पवन माळी, चंदू पवार, दिनेश कडोसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.