मुक्ताईनगर : प्रतिनिधी
विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे. कुटुंब, समाज आणि राष्ट्रविकासात त्याचा सहभाग असला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा अंगीकारून ‘स्वयंसेवक’ बनले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी केले. श्रीमती खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्बोधन शिबिर नुकतेच उत्साहात घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनएसएसचे लक्ष्यगीत सादर करून कार्यक्रमाचा उत्साह वाढविला.
एन.एस.एस. हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे साधन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सुदृढ, बौद्धिक दृष्ट्या गुणवान आणि मानसिक दृष्ट्या कणखर बनले पाहिजे. तसेच एन.एस.एस.चे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ‘माझ्यासाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी’ हे शब्दातून नाही तर आपल्या कृतीतून जगाला संदेश दिला पाहिजे, अशी माफक अपेक्षा प्राचार्य हेमंत महाजन यांनी व्यक्त केली. शिबिराला एन.एस.एस.चे माजी कार्यक्रमाधिकारी प्रा.कोळी यांची विशेष उपस्थिती होती.
शिबिराचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य राजेंद्र चौधरी, ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.दीपक बावस्कर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रणव पवार, शुभम शेळके, नेहा दैवे, प्रतीक्षा चव्हाण, भाग्यश्री भोळे, कोमल दांडगे, कृष्णकांत भारुडकर, कृणाल तायडे, रोशन पाटील, ओम पाटील, हरीओम इंगळे, पवन सुतार, जयेश पाटील, सागर गोरले, नंदन महाजन, यश महाजन, छायाचित्रकार चंदन शिमरे, प्रज्ज्वल भंगाळे, कल्पेश सपकाळे, मयूर कवळे आदी स्वयंसेवकांनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक एन.एस.एस.चे कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय डांगे तर एन.एस.एस.च्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.ताहीरा मीर यांनी आभार मानले.