नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीची सोमवारी (२१ ऑगस्ट) दिल्लीत बैठक होत आहे. भारतीय संघाने आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच्या चिंतेने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी तात्पुरते संघ जाहीर केले आहेत.भारताचे तीन प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह,के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीमुळे खेळापासून दूर राहिले. राहुलने नुकतीच फलंदाजी करायला सुरुवात केली असून तो पुनरागमनासाठी तयार आहे.आता त्याची संघात निवड होते की नाही, हे पाहावे लागेल. श्रेयस अय्यरच्या फिटनेसवर अजूनही शंका आहे.अय्यरने फलंदाजीचा सरावही घेतला आहे मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त मानला जात नाही.