Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»राहुल गांधी 137 दिवसांनी संसदेत परतले
    राजकीय

    राहुल गांधी 137 दिवसांनी संसदेत परतले

    SaimatBy SaimatAugust 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी आज सोमवारी (7 ऑगस्टला) संसदेत पोहोचले. राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच इंडीयाच्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचाही समाव्ोश होता. संसद परिसरात पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

    त्याआधी राहुल गांधी यांनीही आपला ट्विटर बायो बदलला. यामध्ये त्यांनी खासदार असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लोकसभा सचिवालयाकडून आज अधिसूचना जारी करुन राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवले दरम्यान राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लाडू खाऊ घातला. यानंतर खरगे यांनी बाकीच्या नेत्यांना लाडू भरवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांना सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

    भारतातील लोकांसाठी आणि विशेषत: वायनाडच्या लोकांसाठी हा दिलासा आहे. भाजप आणि मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात जो काही व्ोळ शिल्लक आहे त्याचा वापर करुन विरोधी नेत्यांना लक्ष्य करुन लोकशाहीला बदनाम करण्याऐवजी खऱ्या कारभारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर सचिन पायलट म्हणाले की, सत्याचा विजय झाला. जनतेचा आवाज पुन्हा संसदेत बुलंद होईल. राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्याने लोकशाही वाचवण्यासाठी आणि सार्वजनिक समस्या मांडण्याच्या लढ्याला नवं बळ मिळेल. उज्ज्वल भविष्याचा पाया रचून भारताला सक्षम बनवण्याच्या दिशेने सर्वजण एकत्रितपणे पुढे जातील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Girish Mahajan on Raj thackeray : राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका – “निवडणूक आली की मराठी अस्मिता आठवते!”

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.