Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनी १५० तक्रारी निकाली
    जळगाव

    जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनी १५० तक्रारी निकाली

    SaimatBy SaimatJuly 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    District Police Force resolved 150 complaints on Grievance Redressal Day-saimat
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    येथील पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल मध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी १ जूलै रोजी सकाळी ११ वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांच्या उपस्थितीत जवळपास १५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
    जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे म्हणून तक्रार निवारण दिन ही संकल्पना राबविण्यात येते. महिन्याच्या प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी जळगाव शहरात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. यात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी नुसार त्यांना तक्रार निवारण दिनाचे दिवशी बोलावण्यात येते. त्यावेळी अर्जदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे अशा दोघांना बोलावण्यात येते. यात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेवून त्या निकाली काढल्या जातात. यावेळी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी सुद्धा याठिकाणी उपस्थित असतात. पूर्ण आठवडाभरात तक्रारींची यादी तयार करून त्यानुसार तक्रारदार यांना बोलावण्यात येते. या अनुषंगाने पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला.
    यावेळी शनिपेठ ठाण्याचे एकूण ८६ अर्ज प्रलंबित होते त्यापैकी ५० अर्ज तर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे १६० अर्जांपैकी १०० अर्ज असे एकूण १५० अर्ज निकाली काढण्यात यश आले आहे. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसात उर्वरित अर्ज सुद्धा निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. तक्रारीमध्ये जास्तीत जास्त तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या असतात. तर एकमेकांविरोधात तक्रार असेल तर त्यानुसार दोघांनी सुनावणी घेवून कारवाई केली जाते. यावेळी तक्रारदार नागरिकाचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.