साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
संप काळात एस.टी.महामंडळात महाराष्ट्रात एकूण ८०० कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती चालकांना कोणतेही सुचना न देता अचानक जळगाव विभागात वाहतूक विभागाने दि.३सप्टेंबर रोजी कत्राटी चालकांना कमी करण्याचे आदेश काढले एस.टी. महामंडळाचे या निर्णयामुळे कत्राटी चालकांनवर उपासमारिची वेळ आली आहे.
संपामध्ये लालपरीला साथ देणारे कत्राटी चालक यांचा विचार करावा व कायम स्वरूपी करावे असे निवेदन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.तरी एसटी महामंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे, निवेदनावर नेहाल सय्यद,नितेश कोळी,मजर खान,कृष्णा वराडे,अमजत खान अमीर पटेल यांची स्वाक्षरी आहे.