Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आ. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
    Uncategorized

    भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आ. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

    SaimatBy SaimatAugust 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह प्रतिनिधी सिंधुदुर्ग

    सिंधुदुर्ग |: राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली.मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना भात खरेदीच्या वरती देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम मिळालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो शेतकरी आज बोनसच्या रक्कमे पासून वंचित आहेत .लवकरात लवकर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी या , मागणीसाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

    कोकणातल्या शेतकऱ्यांना भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देत विधान भवन परिसर या आमदारांनी दणाणून सोडले.

    राज्य सरकारच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रे निश्चित करून, शेतकऱ्यांकडून उच्चांकी भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या भाताला दर वाढवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताला १९४० रु वाढीव दर व ७०० रु बोनस रक्कम देखील देण्यात आला. गतवर्षी पेक्षा जास्त दर यावर्षी देण्यात आला. मात्र सरकार बदलल्याने बोनसची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणावर होत असून, या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणे गरजेचे असून लवकरात लवकर हि रक्कम मिळावी यासाठी आंदोलन केल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.