Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»काँग्रेसतर्फे ‘भारत जोडो’ नवसंकल्पांतर्गत जिल्ह्य़ात निघणार 75 किलोमीटर पदयात्रा
    जळगाव

    काँग्रेसतर्फे ‘भारत जोडो’ नवसंकल्पांतर्गत जिल्ह्य़ात निघणार 75 किलोमीटर पदयात्रा

    SaimatBy SaimatMay 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    काँग्रेसतर्फे राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित नवसंकल्प शिबिरात ‘भारत जोडो’चा नवसंकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्ह्यात 75 किलोमिटर पदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस कार्यकर्ते दररोज 20 किमी पायी चालणार आहेत.या पदयात्रेला 15 ऑगस्टनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी काल काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

    देशातील विषम परिस्थिती आणि आव्हाने लक्षात घेऊन काँग्रेसने शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. धार्मिक आणि जातीय विभाजनाच्या जाळ्यात अडकवून निवडणुकीत हित साध्य करणे हे भाजपचे राजकारण असून तोच मुद्दा या बैठकीत चिंतनाचा विषय होता. विचार मंथनातून सहा विषयांवर सहा गट तयार करण्यात आले. काँग्रेस कार्यकारिणीचे 50 टक्के पदाधिकारी 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत,या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगितले.

    यावेळी माजी खासदार डॉ.उल्हासदादा पाटील यांनी केंद्रातील भाजपा सरकार विविध सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून महागाई,बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव,महिला सुरक्षितता,संस्थांचे खासगीकरण,आदी विषयांवर समाधानकारक पाऊले उचलण्यास तयार नसल्याने मोदी सरकारबद्दल जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.त्याचा लाभ येत्या सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला निश्‍चित होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

    या पत्रकार परिषदेला आमदार शिरीषदादा चौधरी,योगेंद्रसिंग पाटील,विनोद कोळपकर,महानगर अध्यक्ष श्‍याम तायडे,माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील,उदयसिंग पाटील,सरचिटणीस जमील शेख,युवक काँग्रेसचे देवेंद्र मराठे,ज्ञानेश्‍वर कोळी,ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी,अमजद पठाण आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.