Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»परिवर्तन कला महोत्सवाचे ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन
    जळगाव

    परिवर्तन कला महोत्सवाचे ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

    saimat teamBy saimat teamFebruary 1, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    नाटक, साहित्य, संगीत, नृत्य क्षेत्रात ‘परिवर्तन जळगाव’ ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे.सातत्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती,गंभीर स्वरूपाचे नाटक करणारी व आयोजन करणारी ही संस्था या वर्षी दशकपूर्ती साजरी करीत आहे.
    प्रायोगिक स्तरावर उत्तम काम करणा-या परिवर्तनने निर्मित केलेल्या नाटकांचा व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ५,६ व ७ फेब्रुवारी २०२१ या काळात तीन दिवस शुक्रवार पेठेतील जोत्सना भोळे सभागृहात परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन नाटकघर पुणे व अतुल पेठे यांच्यावतीने करण्यात आले आहे. खान्देशी मातीचा, भाषेचा गोडवा आणि वैविध्यपूर्णता हे परिवर्तन संस्थेच्या निर्मितीचं वैशिष्ट्य असतं. या तीन दिवसीय महोत्सवाची सुरवात शंभू पाटील लिखित ’अमृता साहिर इमरोज’ या नाटकाने होणार आहे. हे वर्ष अमृता प्रीतम यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या अनुषंगाने परिवर्तनने या नाटकाची निर्मिती केली आहे. अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी व इमरोज यांच्या नात्यावर, साहित्यावर, जीवनावर व एकंदरीत प्रवासावर भाष्य करणारे हे प्रायोगिक रंगभूमीवरचे नाटक आहे.
    यानंतर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तिचित्रणावर आधारित ’नली’ एकलनाट्य सादर होणार आहे.याचे नाट्यरूपांतर शंभू पाटील यांचे आहे. या नाटकाचा ४७ वा प्रयोग महोत्सवात सादर केला जाणार आहे. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दि. ६ फेब्रुवारी, शनिवारी ’कुरुक्षेत्रानंतर’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित महाश्वेता देवींना समर्पित हा नाट्यप्रयोग आहे. महोत्सवाचा समारोप शेवटच्या दिवशी ७ फेब्रुवारी, रविवारी ’हंस अकेला’ या सांगीतिक कार्यक्रमाने होईल. संत कबिरांच्या साहित्याचा व जीवन प्रवासाचा परिवर्तनने सांगीतिक शोध घेतला आहे.
    तीन दिवसात चार उत्तम कार्यक्रम पहायची व अनुभवायची संधी रसिकांना मिळणार आहे. जोत्सना भोळे सभागृहात दररोज सायंकाळी ७ वा.हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. प्रवेशिका कार्यक्रम स्थळी एक तास अगोदर उपलब्ध होतील. या महोत्सवासाठी महावीर क्लासचे विशेष सहकार्य मिळत आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांचेही सहकार्य लाभत आहे.खान्देशी मातीचा व भाषेचा गोडवा अनुभवण्यासाठी रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन नाटकघर पुणे व अतुल पेठे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jagnade Maharaj : जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव, बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

    December 21, 2025

    Parola : अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

    December 21, 2025

    healthy life : सातत्य, सकारात्मक विचार, सजगता निरोगी जीवनाचे गमक

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.