शहर विकासासाठी प्राप्त झालेल्या १० कोटींच्या निधीतील कामे पूर्वीच ठरलेली असल्याने जिल्हा नियोजन समितीतून १० कोटींचा विशेष निधी मिळावा, अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत १० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केल्याची माहिती नियोजन समिती सदस्य नितीन बरडे यांनी दिली.
शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. निधीतील कामांचे प्रत्येक प्रभागाला ४० लाख याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते. मात्र अगोदरच झालेल्या महासभेत इतर कामांना मंजुरी देण्यात आल्याचे लक्षात आल्याने नव्याने सुचवलेली कामे थांबणार होते. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच पालकमंत्री पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून डीपीडीसीतून निधी देण्याची विनंती केली होती. शुक्रवारी सकाळी महापौर सोनवणे यांनी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांंची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.