‘ मलिक मुस्लिम आहेत, म्हणून पवारसाहेब राजीनामा घेत नाहीत का?’

0
2

मुंबई : प्रतिनिधी
महापालिकेचं युद्ध जिंकण का महत्वाचं आहे. हे संम्मेलन तळागळातील सहकारी ज्यांच्यामुळे आम्ही पोहचतो शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचणे महत्वाचं आहे. पंतप्रधानाचे विचार फडणवीसांचे विचार पोहचवणे गरजेच आहे. मुंबईत चांगल जीवन जगायचं असेल, तर निवडणुका लागणार आहेत. आचार संहिता लागणार आहे. जनतेला समजावावं लागेल की भाजपाचा झेंडा मुंबईकरांच्या अस्मितेचा आहे. असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. ते आज आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये वॉर्डमध्ये वॉर्ड कार्यकर्ता संम्मेलन आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, १९९२-९३ ला हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हातभार लावला तसंच १९९३ मध्ये लोकांची घर उध्वस्त केली यासाठी आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतोय, पवारसाहेब फार मोठे नेते आहेत. पवारसाहेबांना विचारायचं आहे. ज्याचे दाऊदशी संबंध आहे त्याचा राजीनामा का घेत नाही आणि अनिल देशमुख मराठी आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला का? नवाब मलिक मुस्लिम आहे म्हणून राजीनामा घेत नाही का? असा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, विधीमंडळात वाघाचा मांजर झाला म्हणून मी म्याव म्याव म्हणालो तर मी चुकीचा झालो, असही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी काय अपशब्द काढले मी वाचून दाखवू शकतो आणि ते नवाब मलिक यांच्या घरी जाऊन सात्वन करत आहेत. तरुणांना बर्बाद करण्याचं काम नवाब मलिक करत आहे. सगळे एका माळेचे मणी आहेत. एकाच दुखल की दुसऱ्याला लागत सगळे एकमेकांना आयोडेक्स लावत आहेत. मोदींनी राम मंदिर बांधल, ३७० हटवलं तेव्हा दंगल झाली नाही बाहेर पडण्याची दंगल करण्याची एकाचीही हिम्मत झाली नाही. मुंबई विकणाऱ्या लोकांची सत्ता नको मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेनी पाहत असतील तर आरे ला कारे करणाऱ्याची सत्ता आली पाहिजे असही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here