गिरणा धरणातून सोडले 800 दलघमी आवर्तन

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
गिरणा धरण यंदा पावसाळ्यात 100 टक्के भरले होते. त्यातून जिल्ह्यासाठी पाच आवर्तन राखीव करण्यात आले आहेत. यापैकी चौथे आवर्तन मंगळवारी जळगाव शहरानजीकच्या बांभोरी नदीपात्रात पोहोचले. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात जिल्ह्यातील दोन पालिका क्षेत्रासह अनेक गावांच्या पिण्याच्य पाण्याची सोय झाली आहे. पाचवे व शेवटचे आवर्तन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

गिरणा धरणातून जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाण्यातून 1500 क्यूसेसचे चौथे आवर्तन 1 मे रोजी सोडण्यात आले होते. ते चाळीसगाव, भडगाव, पाचोरा पालिका व पाचोरा एमआयडीसी, दहिगाव संतमार्गे काळनदा येथे दहा दिवसांत पोहचले. या पाण्याचा 150 किमी प्रवास झाला. या मार्गातील शंभरावर गावांची तहान भागणार आहे.

1500 क्युसेस वेगाने आवर्तन
धरणातून 1500 क्युसेस वेगाने दहा दिवसांत 800 दशलक्ष घनफूट पाणी सेोडले बाष्पीभवन, बंधारे भरणे, पाणी चोरी वगळता जळगावपर्यंत 280 दशलक्ष घनफूट पाणी पोहचले.
पाचवे व शेवटचे आवर्तन केवळ पिण्यासाठी असेल
जिल्हा प्रशासनाने राखीव ठेवलेल्या पाणीसाठ्यातून पाचवे आवर्तन पालिका, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा योजनांच्या मागणीनुसार जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ते सोडले जाईल.
-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here