• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result
Home जळगाव

आपण जलसाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज – खा. उन्मेष पाटील

नेहरू युवा केंद्रातर्फे 'कॅच द रेन'वर वेबिनार संपन्न, युवकांना केले आवाहन

Team Saimat Live by Team Saimat Live
January 24, 2022
in जळगाव
0
आपण जलसाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज – खा. उन्मेष पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी । आज आपल्याला पाण्याचे महत्व मी सांगणे गरजेचे नाही. देशात आणि जगात पाण्यामुळे होत असलेले वाद मी सांगणार नाही परंतु सुजलाम, सुफलाम असलेल्या माझ्या खान्देश, शेतकरी, तरुण, रोजगार, उद्योग आणि जीडीपीला पाण्याच्या दुर्भिक्षाचा कसा फटका बसतो आहे हे आपण पाहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने हाती घेतलेल्या ‘कॅच द रेन’ उपक्रमात आपले योगदान देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतः जलसाक्षर, पर्यावरण साक्षर होऊन इतरांना देखील साक्षर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील यांनी केले.

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘कॅच द रेन’ उपक्रमाचे महत्व युवकांना पटवून देण्यासाठी रविवारी ऑनलाईन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषण देताना खा.उन्मेष पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी ‘कॅच द रेन’ विषयाबद्दल सविस्तर माहिती देत स्वयंसेवक जिल्ह्यात करीत असलेल्या जनजागृतीबाबत सांगितले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे लेखाकार अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, रोटरीचे माजी प्रांतपाल समकित छाजेड आदी उपस्थित होते. योगी संस्थेच्या अक्षता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गिरीश पाटील यांनी मानले.

खा.उन्मेष पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, जलशक्ती मंत्रालयाने हाती घेतलेला ‘कॅच द रेन’ उपक्रम राबविण्यासाठी पाण्यासाठी काम करणाऱ्या नेहरू युवा केंद्राला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यातील नद्या एकेकाळी १२ माही वाहत होत्या परंतु जल, जंगल, जमीन यांचा समतोल न राखला गेल्याने त्या आज १२ दिवसच वाहतात. जैवविविधता, निसर्गाचे चक्र आज विस्कळीत झाले आहे. आपण पाण्याचे नैसर्गिक स्रोत जीवित ठेवल्यास शाश्वत जीवन आपल्याला जगता येईल. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग केवळ शहरात नव्हे तर ग्रामीण भागात होणे देखील आवश्यक आहे. एकीकडे वृक्ष लागवड करताना दुसरीकडे पाणी अडविणे देखील गरजेचे आहे. छतावरील पाणी जिरवण्याचे आणि भूगर्भातील पाणी वाचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ज्या क्षणी पाऊस पडेल तेव्हा तो अडवायचा आणि जिरवायचा असेल तर त्यासाठी अगोदर नियोजन करावे लागेल, असे ते म्हणाले.

खा.उन्मेष पाटील म्हणाले, पावसाचे पाणी वाचविण्यासाठी आता आपल्याकडे ४ महिने असून आतापासून नियोजन केल्यास जूनमध्ये पाणी अडविणे शक्य होईल. दरवर्षी पडणाऱ्या २० – २५ तासाच्या पावसात ३६५ दिवसाचे नियोजन करून पावसाचा एक-एक थेंब वाचवणे आवश्यक आहे. पाण्याचे नियोजन असेल तर उद्योग येतील, रोजगार मिळेल, आर्थिक चक्रे फिरतील. पाऊस केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जीवन चक्रासाठीच आवश्यक आहे. आपण स्वतः जलसाक्षर, पर्यावरण साक्षर होऊन इतरांना साक्षर करावे लागेल. जलशक्ती अभियान हे त्यासाठी उत्तम माध्यम आहे. सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, लोक प्रतिनिधी या उपक्रमात एकत्र येतील. जोपर्यंत सज्जन शक्ती एकत्र येत नाही तोवर आपण बलाढ्य राष्ट्र घडवू शकत नाही. आपल्या जिल्ह्याला खूप चांगली भौगोलिक स्थिती लाभली आहे. नदी पुनरुज्जीवनसाठी आपण योगदान देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाणी संवर्धन आणि वृक्ष लागवडहा हेतू साध्य करण्यासाठी बांबू लागवड करावी आणि त्यासाठी पोकरा योजना, बांबू लागवड, मनरेगा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा.पाटील यांनी केले.

खा.उन्मेष पाटील यांनी, रासायनिक शेती ऐवजी जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय शेतीचा प्रयोग करा. भूगर्भात, शेतात पाणी अडवायचे असेल तर ते सेंद्रिय शेतीत जाणे आवश्यक आहे. रासायनिक शेती पाणी अधिक शोषून घेत जमिनीला कडक बनवते. आपण सर्वांनी तहानलेल्या भागाचे दुःख समजून घेत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा, असे खा.पाटील यांनी आवाहन केले. गिरणा परिक्रमेच्या माध्यमातून आपण नदी पुनरुज्जीवन करण्याचे कार्य सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून हाती घेतलेला कॅच द रेन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे. कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी त्या कामाचा प्लॅन अगोदर मनात तयार व्हायला हवा. नेहरू युवा केंद्राने हा प्लॅन तयार करण्याचे काम केले, असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यात यशस्वी होऊ असा विश्वास खा.उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, माजी युवा स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, चेतन वाणी, आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी, योगी संस्थेचे प्रणिलसिंग चौधरी आदींसह इतरांनी परिश्रम घेतले.

ShareTweetSendShare
Previous Post

नेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Next Post

भोळे महाविद्यालयात प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न

Team Saimat Live

Team Saimat Live

Next Post
भोळे महाविद्यालयात प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न

भोळे महाविद्यालयात प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 − two =

Stay Connected

ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

June 27, 2022
सार्वजनिक बांधकाम विभाग बनले सार्वजनिक वर्गणीचे ठिकाण

सार्वजनिक बांधकाम विभाग बनले सार्वजनिक वर्गणीचे ठिकाण

March 2, 2022
कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल

December 23, 2021
Alert : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Alert : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

July 13, 2022
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार

1
प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला

प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला

0
जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम- मोहन भागवत

जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम- मोहन भागवत

0
एमडीएच मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

एमडीएच मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

0
🚩🚩 ज्योतिष शास्त्रा नुसार आणि आरोग्य शास्त्र नुसार गुढीपाडव्याचे महत्व 🚩🚩

🚩🚩 ज्योतिष शास्त्रा नुसार आणि आरोग्य शास्त्र नुसार गुढीपाडव्याचे महत्व 🚩🚩

March 20, 2023
फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला

फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला

March 20, 2023
भुसावळात रविवारी रंगणार कालिदास काव्यमहाेत्सव

भुसावळात रविवारी रंगणार कालिदास काव्यमहाेत्सव

March 20, 2023
बोदवड येथे माथेफिरू तरुणाने कुट्टीचे शेड व मोटारसायकल पेटवली

बोदवड येथे माथेफिरू तरुणाने कुट्टीचे शेड व मोटारसायकल पेटवली

March 20, 2023

Recent News

🚩🚩 ज्योतिष शास्त्रा नुसार आणि आरोग्य शास्त्र नुसार गुढीपाडव्याचे महत्व 🚩🚩

🚩🚩 ज्योतिष शास्त्रा नुसार आणि आरोग्य शास्त्र नुसार गुढीपाडव्याचे महत्व 🚩🚩

March 20, 2023
फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला

फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला

March 20, 2023
भुसावळात रविवारी रंगणार कालिदास काव्यमहाेत्सव

भुसावळात रविवारी रंगणार कालिदास काव्यमहाेत्सव

March 20, 2023
बोदवड येथे माथेफिरू तरुणाने कुट्टीचे शेड व मोटारसायकल पेटवली

बोदवड येथे माथेफिरू तरुणाने कुट्टीचे शेड व मोटारसायकल पेटवली

March 20, 2023
Saimat Live

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • अमळनेर
  • अहमदनगर
  • अहमदाबाद
  • आयुर्वेद
  • आरोग्य
  • आर्थिक वार्ता
  • ई – पेपर
  • उस्मानाबाद
  • एरंडोल
  • औरंगाबाद
  • कासोदा
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • गोंदिया
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • ठाणे
  • तंत्रज्ञान
  • देश
  • देश- विदेश
  • धरणगाव
  • धानोरा
  • धार्मिक
  • धुळे
  • नंदूरबार 
  • नाशिक
  • निधन वार्ता
  • पर्यटन
  • पर्यावरण
  • पाचोरा
  • पारोळा
  • पाळधी
  • पुणे
  • फैजपूर
  • बुलढाणा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मनोरंजन
  • मलकापूर
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यवतमाळ
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • वरणगाव
  • वैभववाडी
  • व्हिडीओ
  • शेंदुर्णी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • सिंधुदुर्ग
  • सोयगाव
  • हिंगोली

Recent News

🚩🚩 ज्योतिष शास्त्रा नुसार आणि आरोग्य शास्त्र नुसार गुढीपाडव्याचे महत्व 🚩🚩

🚩🚩 ज्योतिष शास्त्रा नुसार आणि आरोग्य शास्त्र नुसार गुढीपाडव्याचे महत्व 🚩🚩

March 20, 2023
फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला

फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला

March 20, 2023
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Copyright © 2022 SaimaltLive | Website maintained by JC Techsoft Solution

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर

Copyright © 2022 SaimaltLive | Website maintained by JC Techsoft Solution

error: Content is protected !!

https://chat.whatsapp.com/DKtI0k5E6gZ1Jq65akdFzf

WhatsApp