After delivery : प्रसुतीनंतर डॉक्टरांकडून टॉवेल पोटातच; तीन वर्षे कोमात राहिलेल्या महिलेचा मृत्यू

0
11

पतीच्या १७ वर्षे पाठपुराव्यानंतर राज्य ग्राहक आयोगाचे २६ लाख ५० हजार रुपये भरपाईचे आदेश

साईमत/ पुणे/प्रतिनिधी :  

पुण्यात सीझेरियन प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या पोटात टॉवेल राहिला. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला तीन वर्षे कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या पतीने १७ वर्षे न्यायासाठी लढा दिला अखेर राज्य ग्राहक आयोगाने रुग्णालय व डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणा आणि त्रुटीयुक्त सेवेसाठी जबाबदार धरलं रुग्णालय आणि डॉक्टरांना महिलेच्या पतीला २६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाषाण येथील प्रशांत कुकडे यांनी सूस रस्त्यावरील जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांच्या विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांची पत्नी रूपाली यांना ८ ऑगस्ट २००८ रोजी दुसऱ्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सीझेरियन शस्त्रक्रियेनंतर टाके घालताना डॉक्टरांच्या लक्षात आलं की, टॉवेल महिलेच्या पोटातच राहिला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा टाके उघडावे लागले.

नंतर लगेचच रूपाली यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना ‘एन्सेफॅलोपॅथी’ (मेंदूला सूज येणे) झाल्याने आणखी तिसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु दुर्दैवाने त्या कोमात गेल्या. तीन वर्षे कोमात राहिल्यानंतर १ मे २०११ रोजी त्यांचे निधन
झालं.

रम्यान, २००८ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीवर तब्बल सतरा वर्षांनी निकाल लागला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे आणि सदस्य नागेश कुंबरे यांनी हा निकाल दिला. या निकालाने शस्त्रक्रियेनंतर निष्काळजीपणा, अत्यवस्थ रुग्णाला त्वरित उच्च-सुविधा केंद्रात न पाठवणे, तातडीने वैद्यकीय कागदपत्रे न देणे यांसारख्या ग्राहक सेवेतील त्रुटी आणि निष्काळजीपणा अधोरेखित झाला आहे. यापुढे रुग्णांच्या नातेवाइकांना ग्राहक आयोगाकडे दाद मागता येईल.

तक्रारदारांचे वकील अॅड. ज्ञानराज संत यांनी सांगितले की, विलंबाने का होईना; पण न्याय मिळाला आहे. या निकालामुळे डॉक्टरांच्या कामाच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यास आणि वैद्यकीय सेवेत पारदर्शकता आणण्यास मदत होईल.
आयोगाने निष्कर्षात म्हटलं आहे की, प्रसूतीनंतर रुग्ण महिला अत्यवस्थ असतानाही तिला तातडीने उच्च दर्जाच्या रुग्णालयात पाठवलं नाही. रुग्णालय आणि डॉक्टरांनी ‘डिस्चार्ज’ सह इतर वैद्यकीय कागदपत्रे दीड महिन्यानंतर दिली.

ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने निष्कर्ष नोंदवला की, प्रसूतिपूर्वी महिला उपाशी नव्हती तिची श्वसननलिका सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजना केल्या नाहीत. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी दक्ष राहणं आवश्यक होतं. याबाबी वैद्यकीय निष्काळजीपणा व त्रुटीयुक्त सेवा असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here