Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात उबाठाही सहभागी
    चाळीसगाव

    देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात उबाठाही सहभागी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    हिंदू समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, काश्‍मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजविणे या मुद्द्यांवर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या षडयंत्राला उद्धव ठाकरे यांचीही मान्यता आहे, असा हल्लाबोल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केला. ते चाळीसगाव येथे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

    पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष नितीन पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संगीता गवळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बाविस्कर, ब्राह्मणशेवगेचे सरपंच रत्नाकर पाटील, इच्छापुरचे सरपंच निलेश राठोड, युवा मोर्चाचे रुपेश पाटील, तालुका कार्यकारिणी सदस्य राम पाटील आदी उपस्थित होते.

    देशात अस्थिरता माजविणे, जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी थेट पाकिस्तान धार्जिणी धोरणे राबविणे ही इंडी आघाडीची नीती उघड झाली आहे. भारतातील प्रगती, समृद्धी, आणि आर्थिक उन्नतीमुळे जगात वाढत असलेली भारताची प्रतिष्ठा व ताकद सहन होत नसलेल्या विदेशी शक्तींनी इंडी आघाडीमार्फत आपल्या कारवाया सुरू केल्या असाव्यात, असा संशयही अजित चव्हाण यांनी व्यक्त केला. समाजात फूट पाडल्याखेरीज आपल्या कारवाया यशस्वी होणार नाहीत, असा त्यांचा कयास असला तरी देशातील समाज कारवाया यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्‍वासही अजित चव्हाण यांनी व्यक्त केला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Nashik Municipal Corporation : नाशिक मनपात परिवर्तन घडविणार : आदित्य ठाकरेंचा निर्धार

    December 27, 2025

    भास्करराव पाटीलचा पक्षप्रवेश; आमदार सुरेश भोळेंच्या उपस्थितीत मोठा उत्सव

    December 26, 2025

    Eknath khadse on Girish Mahajan : “मी भाजपचा नाही, विरोधक आहे” – खडसेंचा महाजनांवर थेट हल्ला

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.