साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगावातील मन्यार गावातील फातीमा नगरमध्ये दररोज कसाई कायदाचे उल्लंघन करत गोहत्या करीत होते. त्याची माहिती पत्रकार विकास पाथरे, प्रमोद रूले यांनी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना दिली. त्यानंतर अवघ्या काही वेळात घटनास्थळी पोलीसदल दाखल होत सकाळी कापल्या गेलेल्या गोवंशाच्या मासांने भरलेली ॲपेरिक्षा मुद्देमालसह जप्त करत दोन जणांना अटक केली. गोवंशची हत्या होत असल्याची माहिती गोरक्षक रोहित महालेंना मिळाली. अपघातात गंभीर जख्मी असतांना आपले सहकारी किशोर खलसे यांच्या मोटर सायकलवर घटनास्थळ गाठले.
त्याठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दीडशे ते दोनशे गोमातेचे चामडे, शिंगे, हाडे अवशेष आढळले. या सर्व गोष्टी बघता गोहत्यासाठी तीन गोमाता पोलीस येण्याआधीच कुठे गायब केल्या. त्या तीन गाईंना गोशाळेत पाठवावे. जळगावातील गोरक्षकांनी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले. गोहत्या करणाऱ्या कसाईंना फाशीची शिक्षा व्हावी, त्या परिसरातील कत्तल खाने चालविणाऱ्या मालकालाही फाशीची शिक्षा व्हावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतांना गोरक्षक जगदीश बैरागी महाराज, गजानन माळी, अशोक शिंदे, रोहित महाले, किशोर खलसे आदी उपस्थित होते.