वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

0
39

साईमत, रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील रसलपूर जवळील पाल येथील सुकी नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर तहसीलदार बंडू कापसे यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास केली. तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची ओरड असतांना केलेली कारवाई वाळू व्यवसायिकांसाठी मोठी चपराक मानली जात आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील रसलपूर जवळील पालकडून रसलपूर येथे वाळू घेऊन आलेल्या तीन ट्रॅक्टरांवर तहसीलदार बंडू कापसे, परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांच्या पथकाने धडक कारवाई केली. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत तहसीलदार पाच वेळा रात्रीच्या वेळी फिल्डवर उतरले. पाचही वेळा त्यांनी अवैध वाळूच्या ट्रॅक्टरांवर कारवाया केल्या आहेत.
वाळूने भरलेल्या तीन ट्रॅक्टरांमध्ये पहिले ट्रॅक्टर (क्र.एमच १९ बिजी ३०७५), दूसरे ट्रॅक्टर (क्र.एमच १९ पी ४१९७) आणि तिसरे विना नंबरचे ट्रॅक्टर मंगळवारी रोजी पहाटे पकडले आहे. अशातच तहसीलदार पाठोपाठ निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी गौण खनिज ट्रॅक्टरांवर कारवाई करण्याची तत्परता दाखविण्याची गरज आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत झालेल्या कारवाया सर्वात जास्त पाल पट्ट्यातील आहे. शहरासह पूर्व भागातही मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरांद्वारे वाळू वाहतूक होत आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पालचे मंडळाधिकारी निलेश धांडे, रावेरचे मंडळाधिकारी यासीन तडवी, खिरोदा प्र.यावलचे जे.डी.बंगाळे, खानापूरचे मंडळाधिकारी विठोबा पाटील, निंभोरा दीपक गवई, पालचे तलाठी गुणवंत बारेला, खानापूरचे तलाठी गोपाळ भगत, रावेरचे तलाठी स्वप्नील परदेशी, सावखेडाचे तलाठी निलेश चौधरी, कोतवाल गणेश चौधरी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here