Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Bori, Bhokarbari Dam : बोरी, भोकरबारी धरणातील जलसाठा शून्यावर
    जळगाव

    Bori, Bhokarbari Dam : बोरी, भोकरबारी धरणातील जलसाठा शून्यावर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणांची तहान भागविण्यासाठी आवर्तन सोडले जाणार

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, यंदा मागच्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट दिसून आली. दुसरीकडे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा मुबलक आहे. गिरणा धरणावरच्या जामदा डाव्या कालव्यातील कॅनाल दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. अशातच ऑगस्ट महिना उजाडला असताना गिरणा धरणातील जलसाठा ६६ टक्क्यांवर आला आहे. अशातच बोरी आणि भोकरबारी धरणातील जलसाठा शून्यावर आहे. त्यामुळे गिरणा धरण १०० टक्के भरल्यानंतर आणि कॅनाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच धरणांची तहान भागविण्यासाठी आवर्तन सोडले जाणार आहे.

    जिल्ह्यात दमदार पावसाअभावी ४ ऑगस्टपर्यंत बोरीसह तीन धरणातील जलसाठा शून्यावरच आहे तर नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाने सातत्य ठेवले आहे. त्यामुळे पुनंद, हरणबारी, केळघर, चणकापूर, ठेंगोडा प्रकल्पातून गिरणा धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे.त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठा ६६ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येही ‘बोरी’ धरणाला आवर्तन मिळण्याची शक्यता कमी आहे. सप्टेंबरच्या मध्यान्हापर्यंत बोरीच्या घशाला कोरड कायम राहण्याची शक्यता आहे.

    कॅनाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

    एरंडोलच्या अंजनी धरणात ४६.४९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यापूर्वीच अंजनी धरणाची पन्नाशीकडे आगेकूच सुरू आहे. त्यामुळे गिरणेच्या आवर्तनातून बोरी धरणाला बूस्टर देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच म्हसवे तलावातही दोन दिवसात चांगला साठा वाढला आहे. त्यामुळे गिरणेच्या आवर्तनाच्या माध्यमातून म्हसवे तलावातून थेट भोकरबारी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. जामदा डाव्या कालव्यावरच्या कॅनालच्या कामाची निविदा संथगतीने पार पडली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कॅनाल दुरुस्तीचे काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन फसले. कॅनाल दुरुस्तीच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महिनाभरात काम पूर्णत्वास येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न

    December 31, 2025

    Jamner:नाचनखेडा येथे पशुपालकांनी ‘चारा लावा, पशुधन वाढवा’ कार्यक्रम उत्साहात

    December 31, 2025

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.