जिल्हास्तरीय हरिपाठासह निरूपण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
योग, याग, विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म… किती कर्मकांड करणार, किती उपाय, तोडगे करणार, मन शुद्ध ठेऊन फक्त एकनिष्ठ राहून पांडुरंग भजा. शहरी भागात हरिपाठ आवश्यक आहे.तो वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा, वर्तमान क्षणी राहणारा आता जीवन जगण्याचा सार सांगणारा ‘हरिपाठ’ असल्याचे ॲड.माईसाहेब महाराज पाटील यांनी सांगितले. राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संत कबीर जयंती आणि आषाढी वारीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय हरिपाठासह निरूपण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ॲड. माईसाहेब महाराज पाटील यांच्यासोबत प्रतिभा शिंदे, संस्थापक-अध्यक्ष राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे धर्मकिर्ती महाराज, ॲड. मधुकर सपकाळे, मनिषा सपकाळे, केतन देशमुख, पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ, प्रो. बापूसाहेब पाटील, प्रा. गणपत धुमाळे, संजय महाराज वाघ, वाय.एस. महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
हरिपाठासाठी ८ संघ तर निरुपणात १० जणांचा सहभाग
स्पर्धेत पाचोरा, यावल, लाडली, लोहारखेडा जिल्ह्यातून ८ संघ आले होते. निरूपणमध्ये ६ वयापासून तर ३० वयापर्यंत १० जण निरूपणसाठी आले होते. यशस्वीतेसाठी ॲड. माईसाहेब पाटील, सतीश सुर्वे, ॲड. विजय राजपूत, प्रवीण सूर्यवंशी, पवन मगरे, क्रांती पवार, फहीम पटेल, अमित पाटील, ॲड प्रल्हाद धुमाळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राहुल भारुडे, रविशंकर ठाकरे यांनी केले.